शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

बियाणाच्या कांद्याचे सोने

By admin | Updated: May 21, 2014 01:11 IST

दत्ता जोशी, घाटनांद्रा सिल्लोड तालुक्यात कांद्याच्या बियाणास सोन्याचा भाव आला असून, गारपिटीतून वाचलेल्या कांद्यापासून शेतकर्‍यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

दत्ता जोशी, घाटनांद्रा सिल्लोड तालुक्यात कांद्याच्या बियाणास सोन्याचा भाव आला असून, गारपिटीतून वाचलेल्या कांद्यापासून शेतकर्‍यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून बियाणाच्या कांद्यापासून शेतकर्‍यांना उत्पन्न तर सोडाच; पण मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. दुष्काळी परिस्थितीत बर्‍याच शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कांद्याने हात दाखवला होता. पेरणीसाठी सर्वांत जास्त खर्च लागणारे हे पीक असून, चांगला भाव मिळाला तरच बियाणाच्या कांद्याची लागवड करणे परवडते, असे संबंधित शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणार्‍या भावामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागलेले असतानाही कांद्याच्या बियाणाची लागवड शेतकरी कधी तरी भाव मिळेल या आशेने करीत आहेत. यंदा भाव चांगला मिळत असल्याने त्यांच्या आशेची निराशा झालेली नाही. नुकसान झाले असले तरी शेतकरी सध्या आनंदात आहेत. कांदा बियाणे खरेदी करणारे शेतकरी सांडूअप्पा कोठाळे म्हणाले की, मागील वर्षी कमी पाणअभावी लागवड झाली नव्हती. यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झाली; परंतु गारपिटीच्या तडाख्यात कांदा बियाणाचे हजारो एकर पीक भुईसपाट झाल्याने म्हणावे तसे उत्पादन होणार नाही. भावात दिवसाकाठी तेजी राहणार आहे. यंदा या भागात चांगला पाऊस झाल्याचा फायदा घेऊन कधीही लागवड न करणार्‍या शेतकर्‍यांनी बियाणाच्या कांद्याची लागवड केली; परंतु गारपिटीच्या तडाख्यातून हे नाजूक असलेले पीक टिकाव धरू शकले नाही व या कांद्याचे मोठे नुकसान झाले; परंतु या तडाख्यातून वाचलेल्या या बियाणास सुरुवातीसच ४० ते ४५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण असले तरीही मिळणार्‍या भावामुळे व गारपिटीने नुकसान झालेल्या कांद्याचे दु:खही तेवढेच जाणवत आहे.