शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कांदा @ ६०; सर्वसामान्य त्रस्त

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला

बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला असल्याने सर्वसामान्यांच्या आठवडी बाजाराचे बजेट कोलमडले आहे. पाऊस चांगला न झाल्यामुळे नवीन कांद्याची लागवड झाली नसल्यामुळे कांदाचाळीतील कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे.बीड जिल्ह्यामध्ये नगर व राहुरी या भागातून थोड्या प्रमाणावर कांद्याची आवक होते. बाहेरील जिल्ह्यातून फारसा कांदा बीडमध्ये येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीत राखून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस येतो. यंदा पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे नवीन कांदा लागवड झाली नाही. जुनाच कांदा सध्या बाजारात दाखल होत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजारात २० ते २५ क्ंिवटल कांदा प्रतिदिन येत होता. मात्र, आता हाच कांदा प्रतिदिन ७ ते ८ टनावर जाऊन पोहोचला आहे. एवढी कमी आवक होत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत कांदा १५ ते २० रूपये विक्री केला जायचा. आॅगस्टच्या सुरूवातीला कांद्याचे भाव ३० रूपये होते तर आता कांदा थेट ५० ते ६० रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. भाववाढ झाल्यामुळे अत्यल्प प्रमाणात कांद्याची खरेदी अल्प प्रमाणात महिलांकडून होत आहे. व्यावसायिकांनीही कांद्याकडे थोडीशी डोळेझाक केली आहे. परंतु त्यांना कांदा वापरल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक वर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कांद्याच्या भावात मोठा बदल होतो. मात्र, यावर्षी आॅगस्ट महिन्यातच कांद्याचे भाव वाढलेले आहेत. नोव्हेंबर ते मार्चच्या कालावधीत नवीन कांदा लागवड होतो. त्यानंतर उत्पादित होणाऱ्या कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र, यंदा परिस्थिती बिकट आहे. जून महिन्यातही पाऊस झालेला नाही आणि सद्य स्थितीलाही पाऊस नाही. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला तर पुढील कालावधीत नवीन कांद्याची लागवड होईल. जर पाऊस नाही झाला तर कांद्याच्या किंमती कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)गतवर्षी ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी कांदा लागवड झाली व त्यांनी कांदा साठवूण ठेवला. कांदाचाळीत ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे. परंतु आता बाहेर राज्य व देशातून कांदा येणार असल्यामुळे कांद्यांच्या किंमती कमी होतील, अशी शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.४जून महिन्यापासून पाऊस न पडल्यामुळे पहिले पीक हातचे गेले आहे. त्यामुळे आता याच कांद्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी जवळपास निर्भर आहेत. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरते का ? हे पुढे समजेल.जुना कांदा बाजारात येत आहे. आवक घटल्यामुळे भाव वाढले आहेत. बाहेर देशातून कांद्याची आवक केली जात आहे. तसेच बाहेर राज्यातील कांदा महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्याच्या कालावधीत कांद्याच्या किंमती कमी होऊ शकतात.- हाफीज बागवान, आडत व्यापारी