शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

एकाच मार्गाला रेल्वेने फोडले फाटे़़!

By admin | Updated: April 4, 2015 00:34 IST

श्रीपाद सिमंतकर, उदगीर बीदर-मुंबई रेल्वेगाडीच्या मंजुरीपासूनच गलथानपणा आणि दुर्लक्षामुळे प्रवाश्यांचे मोठे नुकसान झाले आहे़

श्रीपाद सिमंतकर, उदगीरबीदर-मुंबई रेल्वेगाडीच्या मंजुरीपासूनच गलथानपणा आणि दुर्लक्षामुळे प्रवाश्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ बीदर ते मुंबई (गाडी क्ऱ ११०७६) रेल्वेचा मार्ग लातूर रोड, उस्मानाबाद, पुणे व कल्याण असा आहे़ परतीच्या प्रवासाचा मार्गही हाच आहे़ परंतु, तिकीटावर मनमाड व परभणी असा असल्याने २० रु़ अतिरिक्त मोजावे लागत आहेत़रेल्वे मंत्रालयाच्या वतीने नवीन गाडी सुरु झाल्यानंतर मार्ग, थांबा, तिकीट आदी बाबी अपडेट केल्या जातात़ परंतु, ही रेल्वे सुरु होण्याच्या आधीपासून बीदर-मुंबई गाडीच्या नशिबी वनवासच आहे़ दिवसाच्या प्रवासाचे वेळापत्रक असले तरी मुंबईत अपरात्री पोहचून सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाने तिकीट व त्याच्या मार्गात अपडेट न केल्यामुळे प्रवाशांना तब्बल १७ कि़मी़ व २० रु़ च्या फरकाच्या तिकिटाचा फटका बसत आहे़ ही रेल्वे गाडी सुरु होताना आॅनलाईन आरक्षण अपडेट नव्हते़ ‘लोकमत’ ने यावर प्रकाश टाकल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने सिस्टीम अपडेट केली़ मात्र मध्य रेल्वेने ती अपडेट न केल्यामुळे सामान्य तिकीटावर मनमाड व परभणी मार्ग दिला जात आह़े़ त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ १७ मार्च रोजी उदगीर येथील कादरी यांनी कल्याण जंक्शनवर सामान्य तिकीट काढल्यानंतर ही बाब लक्षात आली़ कादरी यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना केबिनमध्ये बोलावून सिस्टीम अपडेट न झाल्यामुळे हे होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले़ बीदर-मुंबई ही मध्य रेल्वेची गाडी असताना सिस्टीममध्ये अपडेट नाही़ मात्र ती पोहोचते त्या दक्षिण मध्य रेल्वेत मात्र अपडेट आहे़