शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

तब्बल अडीचशे गावांत ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावात सामाजिक सलोखा, एकोपा व कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १५३९ एवढी आहे.गटातटाच्या राजकारणामुळे काही गावांमध्ये एकापेक्षा अधिक गणपतीची स्थापना करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यातून अनेकदा वादाचे प्रकार घडतात. एकाच गावात अनेक गणपती मंडळे स्थापन झाल्यावर पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताच्या दृष्टीने काळजीचा विषय ठरतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकांमध्ये ग्रामपंचायत व तंटामुक्त समित्यांना अधिकाधिक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ स्थापना करण्याच्या आवाहन करण्यात आले होते. अनेक गावांनी स्वत:हून पुढाकार घेत ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. तालुक्यातील जालना, सेवली व मौजपुरी पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक ५५ गावांनी एका गणपतीची स्थापना केली आहे. भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांत प्रत्येकी ५० गावांमध्ये एकच सार्वजनिक गणपती स्थापन करण्यात आला आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येतआहेत.