शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

तब्बल अडीचशे गावांत ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावात सामाजिक सलोखा, एकोपा व कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील २५४ गावांनी एकाच सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या १५३९ एवढी आहे.गटातटाच्या राजकारणामुळे काही गावांमध्ये एकापेक्षा अधिक गणपतीची स्थापना करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र, यातून अनेकदा वादाचे प्रकार घडतात. एकाच गावात अनेक गणपती मंडळे स्थापन झाल्यावर पोलीस यंत्रणेला बंदोबस्ताच्या दृष्टीने काळजीचा विषय ठरतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकांमध्ये ग्रामपंचायत व तंटामुक्त समित्यांना अधिकाधिक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ स्थापना करण्याच्या आवाहन करण्यात आले होते. अनेक गावांनी स्वत:हून पुढाकार घेत ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. तालुक्यातील जालना, सेवली व मौजपुरी पोलीस ठाण्यांतर्गत सर्वाधिक ५५ गावांनी एका गणपतीची स्थापना केली आहे. भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांत प्रत्येकी ५० गावांमध्ये एकच सार्वजनिक गणपती स्थापन करण्यात आला आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात येतआहेत.