शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाची वाढ

By admin | Updated: April 27, 2016 00:31 IST

औरंगाबाद : २१ एप्रिलपासून जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ केली असल्याची घोषणा आज येथे केली.

औरंगाबाद : २१ एप्रिलपासून जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध खरेदी दरामध्ये एक रुपयाने वाढ केली असल्याची व त्याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे ३० ते ३५ हजार दूध उत्पादकांना होणार असल्याची घोषणा आज येथे दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका पत्रपरिषदेत केली. त्यांनी सांगितले की, शासनाचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफकरिता प्रतिलिटर २० रु. दर आहे. तोच संघाचा दर प्रतिलिटर १ रुपया करण्यात आलेला आहे. शासन व्यवस्थापन खर्च प्रतिलिटर ७० पैसेप्रमाणे आहे. तोच व्यवस्थापन खर्च संघाचा प्रतिलिटर एक रुपया आहे. जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे सध्या दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच तूप, श्रीखंड, आम्रखंड, दही, पनीर, लस्सी, ताक, गोड दूध इ.ची निर्मिती करण्यात येत आहे. या दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक करण्याकरिता संघाने दोन नवीन गाड्या खरेदी करून त्याद्वारे या दुग्धजन्य पदार्थांची विक्री विदर्भ व मराठवाड्यामध्ये करण्यात येणार आहे. कारण दुग्धजन्य पदार्थांची जास्तीत जास्त विक्री झाल्यास दूध उत्पादकांना आणखी चांगल्याप्रकारे दर देण्याचा संघाचा मानस आहे, अशी माहिती देऊन बागडे यांनी सांगितले की, स्वच्छ दूध निर्मिती योजनेंतर्गत दूध उत्पादकांसाठी पाच लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या आठ हजार नग कॅन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. त्याची किंमत जवळपास ३० लाख रुपये आहे. येत्या १५ दिवसांत दूध उत्पादकांना या कॅनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ दूध निर्मिती योजनेअंतर्गत ज्या संस्था चांगल्या प्रकारे दूध संकलन करतात, त्या जवळपास ६५ संस्थांना सुमारे २५ लाख किमतीचे दूध तपासणी यंत्रे संघामार्फत मोफत वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षीपेक्षाही यावर्षी दुष्काळ असताना जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ झाली आहे, हे विशेष होय. या पत्रपरिषदेस दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक पुंडलिक काजे, सविता अधाने व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत दारू व बीअर कंपन्यांच्या पाणीकपातीसंबंधीच्या उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे हरिभाऊ बागडे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, सरकारचेही हेच धोरण होते. पिण्याच्या पाण्याला अग्रक्रम दिलाच पाहिजे. पाण्याचे संकट आणखी दोन महिने राहील.