शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसचा गल्ला दररोज एक लाख दहा हजार रुपये

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ...

औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ३० बस रस्त्यावर धावत आहेत. दररोज ६ हजार प्रवासी या बससेवेचा लाभ घेत आहेत. स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडला बससेवेपोटी दररोज १ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे शहर वाहतूक बस आणखी व्यापक प्रमाणात सुरू करावी किंवा नाही या संभ्रमात प्रशासन आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत औरंगाबाद महापालिकेत १०० शहर बसची खरेदी केली आहे. कोरोनामुळे सात महिन्यांपासून ७० बस उभ्या होत्या. उर्वरित ३० बसचा वापर कोरोना रुग्णांसाठी करण्यात आला होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५ नोव्हेंबरपासून शहर बस सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात ३० बस रस्त्यावर धावत आहेत. काही मार्गांवर बसला उत्तम प्रतिसाद आहे. एका बाजूने प्रवासी भरून बस येते, तर दुसऱ्या बाजूने रिकामी जाते. त्यामुळे स्मार्ट सिटी काॅर्पोरेशनला दररोज ३ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. शहर बसचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या टप्प्यात २६, तर तिसऱ्या टप्प्यात २८ शहर बस सुरू करण्याचा विचार महापालिकेचा आहे.

बसचे दररोज निर्जंतुकीकरण

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शहर बसचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवासी फेरीनंतर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वापर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्याचे शहर बस विभागाचे प्रमुख प्रशांत भुसारी यांनी सांगितले.

फिजिकल डिस्टन्सची अडचण

शहरातील काही मार्गांवर शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी बसचा वापर करीत आहेत. वाळूजहून औरंगाबादकडे येणाऱ्या बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सची अडचण होत आहे. एकाच वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येतात, त्यामुळे ही अडचण होत असल्याचे सांगण्यात आले.

रिक्षाचालक सोयीनुसार घेतात भाडे

शहर बसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किलोमीटरनुसार भाडे घेण्यात येते. ज्या ठिकाणी सर्वाधिक शहर बस आहेत त्या ठिकाणी रिक्षाचालक आपल्या सोयीनुसार भाडे घेतात. त्यामुळे असंख्य नागरिक बसऐवजी रिक्षाला प्राधान्य देत आहेत. अनेक मार्गांवर रिक्षाच्या तुलनेत बसचे भाडे अत्यंत कमी आहे.

शहर बस आणि रिक्षा भाडेमधील तफावत

प्रवासाचे ठिकाण- रिक्षा - बस

औरंगपुरा ते रांजणगाव-४०-२५

रेल्वे स्टेशन ते शाहगंज -३०-१५

रेल्वे स्टेशन ते सावंगी - ४०- २५

औरंगपुरा ते शिवाजीनगर -२०-२०

दररोज ३० बस धावतात

कोरोना संसर्गाचे प्रमाण मागील दोन महिन्यांत अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३० बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावत आहेत. या बस दररोज सहा हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करतात.