शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शहर बसचा गल्ला दररोज एक लाख दहा हजार रुपये

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ...

औरंगाबाद : राज्य शासनाने अनलॉकअंतर्गत शहर वाहतूक बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेला परवानगी दिली. ५ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात फक्त ३० बस रस्त्यावर धावत आहेत. दररोज ६ हजार प्रवासी या बससेवेचा लाभ घेत आहेत. स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडला बससेवेपोटी दररोज १ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे शहर वाहतूक बस आणखी व्यापक प्रमाणात सुरू करावी किंवा नाही या संभ्रमात प्रशासन आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत औरंगाबाद महापालिकेत १०० शहर बसची खरेदी केली आहे. कोरोनामुळे सात महिन्यांपासून ७० बस उभ्या होत्या. उर्वरित ३० बसचा वापर कोरोना रुग्णांसाठी करण्यात आला होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ५ नोव्हेंबरपासून शहर बस सुरू करण्यास परवानगी दिली. पहिल्या टप्प्यात ३० बस रस्त्यावर धावत आहेत. काही मार्गांवर बसला उत्तम प्रतिसाद आहे. एका बाजूने प्रवासी भरून बस येते, तर दुसऱ्या बाजूने रिकामी जाते. त्यामुळे स्मार्ट सिटी काॅर्पोरेशनला दररोज ३ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. शहर बसचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसऱ्या टप्प्यात २६, तर तिसऱ्या टप्प्यात २८ शहर बस सुरू करण्याचा विचार महापालिकेचा आहे.

बसचे दररोज निर्जंतुकीकरण

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शहर बसचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवासी फेरीनंतर निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वापर करण्यात येत आहे. प्रवाशांच्या काळजीसाठी सर्व व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्याचे शहर बस विभागाचे प्रमुख प्रशांत भुसारी यांनी सांगितले.

फिजिकल डिस्टन्सची अडचण

शहरातील काही मार्गांवर शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी बसचा वापर करीत आहेत. वाळूजहून औरंगाबादकडे येणाऱ्या बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक असतात. अशावेळी सोशल डिस्टन्सची अडचण होत आहे. एकाच वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येतात, त्यामुळे ही अडचण होत असल्याचे सांगण्यात आले.

रिक्षाचालक सोयीनुसार घेतात भाडे

शहर बसला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना किलोमीटरनुसार भाडे घेण्यात येते. ज्या ठिकाणी सर्वाधिक शहर बस आहेत त्या ठिकाणी रिक्षाचालक आपल्या सोयीनुसार भाडे घेतात. त्यामुळे असंख्य नागरिक बसऐवजी रिक्षाला प्राधान्य देत आहेत. अनेक मार्गांवर रिक्षाच्या तुलनेत बसचे भाडे अत्यंत कमी आहे.

शहर बस आणि रिक्षा भाडेमधील तफावत

प्रवासाचे ठिकाण- रिक्षा - बस

औरंगपुरा ते रांजणगाव-४०-२५

रेल्वे स्टेशन ते शाहगंज -३०-१५

रेल्वे स्टेशन ते सावंगी - ४०- २५

औरंगपुरा ते शिवाजीनगर -२०-२०

दररोज ३० बस धावतात

कोरोना संसर्गाचे प्रमाण मागील दोन महिन्यांत अत्यंत कमी झाले होते. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३० बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावत आहेत. या बस दररोज सहा हजार किलोमीटर प्रवास पूर्ण करतात.