शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गुन्हा एका टोकाला, दाखल दुस-या टोकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:46 IST

पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़मोबाईल, इंटरनेटने जग जवळ आले आहे़ असे असले तरीही हदगाव तालुक्यातील अनेक गावांत कोणत्याही कंपनीचे नेटवर्क चालत नाही़ डोंगराळ व दुर्गम भागात गेल्याशिवाय संवाद होत नाही़ बैठकीचा निरोप चार दिवस अगोदर द्यावा लागतो़ तेव्हा कुठे गावचे सरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष बैठकीला ठाण्यामध्ये उपस्थित राहू शकतात़ हळेगाव असेच एक दुर्गम व डोंगराळ भागातील गाव़ मागील आठवड्यात १३ क्विंटल गांजा याच गावातून जप्त करण्यात पोलिसांना यश आले़ हे गाव तामसा पोलीस ठाण्यापासून १० कि़मी़ अंतरावर आहे़ मात्र या गावाला मनाठा पोलीस ठाणे जोडण्यात आले़ मनाठा पोलिसांचा या गावात संपर्क नाही़ या गावाला जवळची बाजारपेठ तामसा आहे़ खरटवाडी, माळेगाव, शेंदण, जांभळा, ठाकरवाडी, रावणगाव, नाव्हा ही गावे तामसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत़ मात्र गंमत अशी की, ४० कि़मी़ लांब असलेल्या मनाठा ठाण्याला ही गोव जोडण्यात आली़हदगाव तालुक्यात एकूण ३ पोलीस ठाणी आहेत़ मनाठा, तामसा, हदगाव ठाण्यांतर्गत १४५ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित ठाण्यावर आहे़ एका ठाण्यांतर्गत ३८ ते ४० गावे येतात़ मात्र ही गावे ठाण्याच्या लगतची नसून अगदी विरूद्ध टोकाची आहेत़ निजामाच्या काळात ठाण्यांची निर्मिती झाली आहे़ नदीच्या प्रवाहावरून गावच्या हद्दी ठरवण्यात आल्या होत्या़ तीच पद्धत आजही सुरू आहे़ गुन्हा घडल्यानंतर आरोपी पळून जावू नये, पोलिसांना लवकर माहिती मिळणे गरजेचे आहे़घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुन्हा घडून एखाद्याचा मृत्यू, अपघात, जळीतकांड अशा घटना घडतात़ अंतर लांब असल्याने पोलिसांनाही तेथे जाण्यास वेळ लागतो़ यामुळे तपासामध्येही अडथळे येतात़ गाव पुढारी अशा घटनांचे स्वत:च्या फायद्यासाठी श्रेय लाटतात़ गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र चांगल्या माणसावर अन्याय होवू नये असे कायदा सांगतो़ मग सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी, त्याच्या कल्याणासाठी ठाण्यातंर्गत येणारी गावे त्याच ठाण्यांना जोडून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित करता येईल, हे पुढाºयांनी लक्षात घेतले पाहिजे़