शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
6
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
7
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
8
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
9
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
10
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
11
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
12
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
13
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
14
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
15
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
16
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
17
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
18
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
19
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा एका टोकाला, दाखल दुस-या टोकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:46 IST

पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़

सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : पोलीस ठाण्यामध्ये न जाता आता आॅनलाईन तक्रार करता येईल़ मात्र गुन्हा घडला तेथे तपासासाठी पोलिसांना जावेच लागणार आहे़ तालुक्यातील अनेक गावे विरूद्ध दिशेच्या पोलीस ठाण्यास जोडलेली आहेत़ गाव व ठाण्यातील अंतर तब्बल ४० कि़मी़ असल्यामुळे पोलीस व जनतेतील संवाद कमी झाला़ परिणामी घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना लवकर मिळणे कठीण जात आहे़मोबाईल, इंटरनेटने जग जवळ आले आहे़ असे असले तरीही हदगाव तालुक्यातील अनेक गावांत कोणत्याही कंपनीचे नेटवर्क चालत नाही़ डोंगराळ व दुर्गम भागात गेल्याशिवाय संवाद होत नाही़ बैठकीचा निरोप चार दिवस अगोदर द्यावा लागतो़ तेव्हा कुठे गावचे सरपंच पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष बैठकीला ठाण्यामध्ये उपस्थित राहू शकतात़ हळेगाव असेच एक दुर्गम व डोंगराळ भागातील गाव़ मागील आठवड्यात १३ क्विंटल गांजा याच गावातून जप्त करण्यात पोलिसांना यश आले़ हे गाव तामसा पोलीस ठाण्यापासून १० कि़मी़ अंतरावर आहे़ मात्र या गावाला मनाठा पोलीस ठाणे जोडण्यात आले़ मनाठा पोलिसांचा या गावात संपर्क नाही़ या गावाला जवळची बाजारपेठ तामसा आहे़ खरटवाडी, माळेगाव, शेंदण, जांभळा, ठाकरवाडी, रावणगाव, नाव्हा ही गावे तामसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत़ मात्र गंमत अशी की, ४० कि़मी़ लांब असलेल्या मनाठा ठाण्याला ही गोव जोडण्यात आली़हदगाव तालुक्यात एकूण ३ पोलीस ठाणी आहेत़ मनाठा, तामसा, हदगाव ठाण्यांतर्गत १४५ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित ठाण्यावर आहे़ एका ठाण्यांतर्गत ३८ ते ४० गावे येतात़ मात्र ही गावे ठाण्याच्या लगतची नसून अगदी विरूद्ध टोकाची आहेत़ निजामाच्या काळात ठाण्यांची निर्मिती झाली आहे़ नदीच्या प्रवाहावरून गावच्या हद्दी ठरवण्यात आल्या होत्या़ तीच पद्धत आजही सुरू आहे़ गुन्हा घडल्यानंतर आरोपी पळून जावू नये, पोलिसांना लवकर माहिती मिळणे गरजेचे आहे़घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुन्हा घडून एखाद्याचा मृत्यू, अपघात, जळीतकांड अशा घटना घडतात़ अंतर लांब असल्याने पोलिसांनाही तेथे जाण्यास वेळ लागतो़ यामुळे तपासामध्येही अडथळे येतात़ गाव पुढारी अशा घटनांचे स्वत:च्या फायद्यासाठी श्रेय लाटतात़ गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र चांगल्या माणसावर अन्याय होवू नये असे कायदा सांगतो़ मग सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी, त्याच्या कल्याणासाठी ठाण्यातंर्गत येणारी गावे त्याच ठाण्यांना जोडून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित करता येईल, हे पुढाºयांनी लक्षात घेतले पाहिजे़