शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाआड पाणी, तेही दूषित

By admin | Updated: August 2, 2014 01:08 IST

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच.

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच. सध्या शहराला एक दिवसाआड पाणी येत आहे, तेही दूषित. नगराध्यक्षांनी मात्र गोदावरी नदीतील पाणी आटल्याचा हा परिणाम असल्याचे नमूद केले.धर्माबाद शहरात २५९० वैयक्तिक व अधिकृत नळकनेक्शनधारक आहेत. शहरात सार्वजनिक नळ किती आहेत? याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाहीत, अनधिकृत नळांचे तर विचारुच नका. एप्रिल ते जून या दरम्यान पालिकेने दीड लाख रुपयांची वसुली केली. गतवर्षी गोदावरी नदीला भरपूर पाणी असल्याने धर्माबादकरांना दररोज पाणी मिळत होते. तेही दूषित होते. यंदा नदीचे पाणी आटल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.शहरवासियांना वार्षिक नळपट्टी ८०० रुपये आकारण्यात येत होते, आता १२०० रुपये घेतले जात आहेत. एक दिवसाआड पाणी आणि १२०० रुपये नळपट्टी. याचे गणित लोकांना कळाले नाही. १२०० रुपये काय म्हणून भरायचे? असा सवाल नागरिकांचा आहे. नियमित पाणी द्या आणि त्याच पद्धतीने नळपट्टी घ्या, असे लोकांचे म्हणणे आहे. पाणीच नाही तर टॅक्स का वाढविला जातो, याचे उत्तर शहरवासियांना हवे आहे. बहुतांश ठिकाणी पाईप फुटलेले आहेत. दूषित पाणी पाईपमध्ये जाते आणि तेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते, आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करुन पाणी दूषित असल्याचा अहवाल पालिकेला दिला, मात्र पालिकेचे ढिम्म प्रशासन हलायला तयार नाही, प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली पालिकेला साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले, त्याचा उपयोग का केला जात नाही? याचे गौडबंगाल काय? हे लोकांना समजले पाहिजे. याशिवाय नळपट्टीच्या वसुलीचे काय होते? तोही पैसा कुठे जातो? याचे गणितही लोकांना कळत नाही. शहरातील बहुतांश हातपंप बंद पडलेले आहेत. हातपंपांची दुरुस्तीही केली जात नाही. नळाला पाणी येत नसल्याने शहरवासीय आता ‘फिल्टर’च्या पाण्याकडे वळले. त्याचा आर्थिक फटका लोकांना बसत आहेत. (वार्ताहर)गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी, यंदा १२०० गोदावरी नदीत पाणी नसल्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी येत आहे. गोदावरी नदीत बोअर मारण्याच्या कामाला मंज़ुरी मिळाली आहे, लवकरच टेंडर निघेल- विनायकराव कुलकर्णी, नगराध्यक्षगोदावरी नदीत पाणी नाही, त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी होती, यंदापासून नळपट्टी १२०० रुपये करण्यात आली- निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, पालिका, धर्माबादशहरातील नळ कनेक्शनमध्ये वाढ करण्यात आली, मात्र गोदावरी नदीतच पाणी नसल्याने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याशिवाय गत्यंतर नाही- बिरप्पा मदनूरकर, सभापती, पाणीपुरवठा विभाग, धर्माबाद