शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

एक दिवसाआड पाणी, तेही दूषित

By admin | Updated: August 2, 2014 01:08 IST

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच.

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच. सध्या शहराला एक दिवसाआड पाणी येत आहे, तेही दूषित. नगराध्यक्षांनी मात्र गोदावरी नदीतील पाणी आटल्याचा हा परिणाम असल्याचे नमूद केले.धर्माबाद शहरात २५९० वैयक्तिक व अधिकृत नळकनेक्शनधारक आहेत. शहरात सार्वजनिक नळ किती आहेत? याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाहीत, अनधिकृत नळांचे तर विचारुच नका. एप्रिल ते जून या दरम्यान पालिकेने दीड लाख रुपयांची वसुली केली. गतवर्षी गोदावरी नदीला भरपूर पाणी असल्याने धर्माबादकरांना दररोज पाणी मिळत होते. तेही दूषित होते. यंदा नदीचे पाणी आटल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.शहरवासियांना वार्षिक नळपट्टी ८०० रुपये आकारण्यात येत होते, आता १२०० रुपये घेतले जात आहेत. एक दिवसाआड पाणी आणि १२०० रुपये नळपट्टी. याचे गणित लोकांना कळाले नाही. १२०० रुपये काय म्हणून भरायचे? असा सवाल नागरिकांचा आहे. नियमित पाणी द्या आणि त्याच पद्धतीने नळपट्टी घ्या, असे लोकांचे म्हणणे आहे. पाणीच नाही तर टॅक्स का वाढविला जातो, याचे उत्तर शहरवासियांना हवे आहे. बहुतांश ठिकाणी पाईप फुटलेले आहेत. दूषित पाणी पाईपमध्ये जाते आणि तेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते, आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करुन पाणी दूषित असल्याचा अहवाल पालिकेला दिला, मात्र पालिकेचे ढिम्म प्रशासन हलायला तयार नाही, प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली पालिकेला साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले, त्याचा उपयोग का केला जात नाही? याचे गौडबंगाल काय? हे लोकांना समजले पाहिजे. याशिवाय नळपट्टीच्या वसुलीचे काय होते? तोही पैसा कुठे जातो? याचे गणितही लोकांना कळत नाही. शहरातील बहुतांश हातपंप बंद पडलेले आहेत. हातपंपांची दुरुस्तीही केली जात नाही. नळाला पाणी येत नसल्याने शहरवासीय आता ‘फिल्टर’च्या पाण्याकडे वळले. त्याचा आर्थिक फटका लोकांना बसत आहेत. (वार्ताहर)गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी, यंदा १२०० गोदावरी नदीत पाणी नसल्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी येत आहे. गोदावरी नदीत बोअर मारण्याच्या कामाला मंज़ुरी मिळाली आहे, लवकरच टेंडर निघेल- विनायकराव कुलकर्णी, नगराध्यक्षगोदावरी नदीत पाणी नाही, त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी होती, यंदापासून नळपट्टी १२०० रुपये करण्यात आली- निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, पालिका, धर्माबादशहरातील नळ कनेक्शनमध्ये वाढ करण्यात आली, मात्र गोदावरी नदीतच पाणी नसल्याने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याशिवाय गत्यंतर नाही- बिरप्पा मदनूरकर, सभापती, पाणीपुरवठा विभाग, धर्माबाद