शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘वन डे मॅरेज’चा धूमधडाका !

By admin | Updated: April 9, 2015 00:14 IST

संजय तिपाले , बीड ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात?

संजय तिपाले , बीड‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करुन’ ही म्हण प्रसिद्ध आहे. लग्नात सुईपासून ते पंगतीपर्यंतचे नियोजन करताना वधूपित्यांचे काय हाल होतात? हे मुलीच्या लग्नावेळीच कळते. आता मात्र, वधू- वरपित्यांचे काम बऱ्याच प्रमाणात हलके झाले आहे. कारण ‘ट्रेंड’आहे (गेटकेन) ‘वनडे मॅरेज’चा! एकदा ‘ठरले’ की साखरपुड्यातच लग्नाचा बार उडविला जातो. पंगतींऐवजी ‘रिसेप्शन’ला पसंती देण्याकडेही कल आहे.मुली- मुलींच्या पसंतीपासून ते ‘बिदाई’पर्यंतच्या साऱ्याच रुढी-परंपरा आता मोडीत निघाल्या आहेत. लग्नसराईचा आता विशिष्ट कालावधीही राहिलेला नाही. सवडीनुसार मुहूर्त काढून लग्नकार्ये उरकले जातात. पूर्वी गरीब असो की श्रीमंत मुलामुलींच्या लग्नात चूलबंद आवतणे देऊन गावपंगत द्यायचे. आता अवाढव्य खर्चाला फाटा देण्यासाठी गेटकेन विवाहाची पद्धती रुढ होऊ पाहत आहे. मोजक्या पाहुण्यांमध्येच लग्नकार्याचा कौतूक सोहळा उरकला जातो. त्यामुळे वधू- वर पित्यांचा वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय वऱ्हाडींसाठीही सोयीचे झाले आहे. लग्नासारख्या मंगल व आनंदी सोहळ्यात प्रतिष्ठा व श्रीमंती मिरविणारे पैशांची अक्षरश: उधळपट्टी करतानाही पहावयास मिळतात. आधुनिकता व वेगळेपण जपण्यासाठी ‘रिसेप्शन’चे लोण ग्रामीण भागांमध्येही पोहोचले आहे. लग्न मोजक्या लोकांमध्ये व रिसेप्शनला आप्तेष्टांना निमंत्रित केले जाते.विवाहसोहळ्याचा मुहूर्त, पत्रिका, स्टेजवरील सजावट, शामियाना, जेवणातील पदार्थ, कपडे, भांडी, बस्ता यात पर्याय उपलब्ध आहेत.लग्नाच्या बदलत्या ‘ट्रेंड’बाबत पुरोहित आनंतराव कुलकर्णी म्हणाले, विवाह सोहळ्याचा मुहूर्त वधू- वर पक्षाच्या सोयीनुसार काढले जातात. ज्यांना झगमगाटात सोहळा करायचा आहे ते रात्रीचा मुहूर्त शोधतात तर वऱ्हाडींची गैरसोय होऊ नये याकरता काहीजण दुपारच्या मुहूर्तावरच लग्नकार्य उरकतात. पूर्वी हळदीसमारंभ चार दिवसांचा असायचा आता गेटकेन लग्नात सकाळी हळद अन् सायंकाळी लग्न असा झटपट कार्यक्रम असतो. नियमित लग्नकार्यात एक दिवसाचा हळदी समारंभ असतो, असे त्यांनी सांगितले.