शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...

By admin | Updated: August 15, 2014 01:12 IST

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात.

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात. सामान्य प्रशासन विभागाकडे ध्वज फडकविण्याची जबाबदारी आहे. रवी रेड्डी यांच्यासह सहा जणांना हे काम आलटूनपालटून दिले जाते. परंतु रवीचे म्हणणे असे की, मी हे काम आवडीने करतो. ते सांगतात, तिरंगा पहाटे झुंजुमुंजु होत (सूर्य उगवण्यापूर्वी) असताना फडकवला जातो. सूर्याची पहिली किरणे थेट तिरंग्यावर पडावी हा त्यामागचा उद्देश. त्यासाठी शिपायांची रात्रपाळी लावण्यात आलेली आहे. हा शिपाई तिरंगा सन्मानाने चढवितो. त्याच सन्मानाने उतरवितो. रेड्डी सांगतात, तिरंगा फडकविताना, सलामी देताना छाती अभिमानाने फुलून येते. या तिरंग्यासाठी जवान सीमेवर लढत असतो. नेते मंडळी देशासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांनाही सहजासहजी हे भाग्य मिळत नाही; परंतु आम्हाला मात्र, ही संधी सहज उपलब्ध झाली आहे. ऊन, थंडी, वारा, पाऊस काहीही असो झेंडा फडकविण्याची वेळ आम्ही टळू देत नाही, असे सांगताना रवी रेड्डीच्या डोळ्यात आनंद मावत नाही. ते म्हणतात, पहाटे पहाटे जोरदार वारे सुटलेले असते. इमारतीवर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही अधिक असतो. तेव्हा झेंडा फडकावण्याचा अनुभव थरारक असतो. पडत्या पावसात चिंब होऊन झेंडा फडकावताना वेगळीच उभारी येते. लढणारे सैनिक आठवतात. राष्ट्रपती भवनासमोरून होणारी कडक परेड आठवते. देशसेवेची यापेक्षा चांगली संधी ती कोणती असेल.रेड्डी म्हणाले, माझे सहकारी सय्यद अजहर, खान वासे महंमद, सुहास कुलकर्णी, विलास क्षीरसागर आणि उत्तम कुंभार या सर्वांनाच ध्वज संहितेचा उत्तम अभ्यास आहे. आम्हाला ध्वज संहिता खास शिकविण्यात आली. त्यात झेंड्याची गाठ महत्त्वाची. सोबतच वरच्या बाजूला कोणता रंग हवा, यावर भर दिला जातो. प्रशिक्षित कर्मचारी मग एकटाच झेंडा चढवतो व उतरवितो. सर्व राजशिष्टाचार पाळले जातात. पायातील पादत्राणे काढून, डोईवर टोपी ठेवून तिरंगा आम्ही फडकावतो. उतरवितो. राष्ट्रगीतही म्हणतो. शाळेतून बाहेर पडल्यानंतर यानिमित्ताने पुन्हा मागील ४ वर्षांपासून राष्ट्रगीत म्हणण्याचा योग असा आला आहे.