शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...

By admin | Updated: August 15, 2014 01:12 IST

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात.

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात. सामान्य प्रशासन विभागाकडे ध्वज फडकविण्याची जबाबदारी आहे. रवी रेड्डी यांच्यासह सहा जणांना हे काम आलटूनपालटून दिले जाते. परंतु रवीचे म्हणणे असे की, मी हे काम आवडीने करतो. ते सांगतात, तिरंगा पहाटे झुंजुमुंजु होत (सूर्य उगवण्यापूर्वी) असताना फडकवला जातो. सूर्याची पहिली किरणे थेट तिरंग्यावर पडावी हा त्यामागचा उद्देश. त्यासाठी शिपायांची रात्रपाळी लावण्यात आलेली आहे. हा शिपाई तिरंगा सन्मानाने चढवितो. त्याच सन्मानाने उतरवितो. रेड्डी सांगतात, तिरंगा फडकविताना, सलामी देताना छाती अभिमानाने फुलून येते. या तिरंग्यासाठी जवान सीमेवर लढत असतो. नेते मंडळी देशासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांनाही सहजासहजी हे भाग्य मिळत नाही; परंतु आम्हाला मात्र, ही संधी सहज उपलब्ध झाली आहे. ऊन, थंडी, वारा, पाऊस काहीही असो झेंडा फडकविण्याची वेळ आम्ही टळू देत नाही, असे सांगताना रवी रेड्डीच्या डोळ्यात आनंद मावत नाही. ते म्हणतात, पहाटे पहाटे जोरदार वारे सुटलेले असते. इमारतीवर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही अधिक असतो. तेव्हा झेंडा फडकावण्याचा अनुभव थरारक असतो. पडत्या पावसात चिंब होऊन झेंडा फडकावताना वेगळीच उभारी येते. लढणारे सैनिक आठवतात. राष्ट्रपती भवनासमोरून होणारी कडक परेड आठवते. देशसेवेची यापेक्षा चांगली संधी ती कोणती असेल.रेड्डी म्हणाले, माझे सहकारी सय्यद अजहर, खान वासे महंमद, सुहास कुलकर्णी, विलास क्षीरसागर आणि उत्तम कुंभार या सर्वांनाच ध्वज संहितेचा उत्तम अभ्यास आहे. आम्हाला ध्वज संहिता खास शिकविण्यात आली. त्यात झेंड्याची गाठ महत्त्वाची. सोबतच वरच्या बाजूला कोणता रंग हवा, यावर भर दिला जातो. प्रशिक्षित कर्मचारी मग एकटाच झेंडा चढवतो व उतरवितो. सर्व राजशिष्टाचार पाळले जातात. पायातील पादत्राणे काढून, डोईवर टोपी ठेवून तिरंगा आम्ही फडकावतो. उतरवितो. राष्ट्रगीतही म्हणतो. शाळेतून बाहेर पडल्यानंतर यानिमित्ताने पुन्हा मागील ४ वर्षांपासून राष्ट्रगीत म्हणण्याचा योग असा आला आहे.