शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नेत्याला एक दिवस, आम्हाला तर दररोज सन्मान...

By admin | Updated: August 15, 2014 01:12 IST

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात.

शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून रवी ईश्वरलाल रेड्डी हे जि. प. कार्यालयावरील तिरंगा ध्वज पहाटे चढवितात आणि सायंकाळी उतरवितात. सामान्य प्रशासन विभागाकडे ध्वज फडकविण्याची जबाबदारी आहे. रवी रेड्डी यांच्यासह सहा जणांना हे काम आलटूनपालटून दिले जाते. परंतु रवीचे म्हणणे असे की, मी हे काम आवडीने करतो. ते सांगतात, तिरंगा पहाटे झुंजुमुंजु होत (सूर्य उगवण्यापूर्वी) असताना फडकवला जातो. सूर्याची पहिली किरणे थेट तिरंग्यावर पडावी हा त्यामागचा उद्देश. त्यासाठी शिपायांची रात्रपाळी लावण्यात आलेली आहे. हा शिपाई तिरंगा सन्मानाने चढवितो. त्याच सन्मानाने उतरवितो. रेड्डी सांगतात, तिरंगा फडकविताना, सलामी देताना छाती अभिमानाने फुलून येते. या तिरंग्यासाठी जवान सीमेवर लढत असतो. नेते मंडळी देशासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांनाही सहजासहजी हे भाग्य मिळत नाही; परंतु आम्हाला मात्र, ही संधी सहज उपलब्ध झाली आहे. ऊन, थंडी, वारा, पाऊस काहीही असो झेंडा फडकविण्याची वेळ आम्ही टळू देत नाही, असे सांगताना रवी रेड्डीच्या डोळ्यात आनंद मावत नाही. ते म्हणतात, पहाटे पहाटे जोरदार वारे सुटलेले असते. इमारतीवर उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही अधिक असतो. तेव्हा झेंडा फडकावण्याचा अनुभव थरारक असतो. पडत्या पावसात चिंब होऊन झेंडा फडकावताना वेगळीच उभारी येते. लढणारे सैनिक आठवतात. राष्ट्रपती भवनासमोरून होणारी कडक परेड आठवते. देशसेवेची यापेक्षा चांगली संधी ती कोणती असेल.रेड्डी म्हणाले, माझे सहकारी सय्यद अजहर, खान वासे महंमद, सुहास कुलकर्णी, विलास क्षीरसागर आणि उत्तम कुंभार या सर्वांनाच ध्वज संहितेचा उत्तम अभ्यास आहे. आम्हाला ध्वज संहिता खास शिकविण्यात आली. त्यात झेंड्याची गाठ महत्त्वाची. सोबतच वरच्या बाजूला कोणता रंग हवा, यावर भर दिला जातो. प्रशिक्षित कर्मचारी मग एकटाच झेंडा चढवतो व उतरवितो. सर्व राजशिष्टाचार पाळले जातात. पायातील पादत्राणे काढून, डोईवर टोपी ठेवून तिरंगा आम्ही फडकावतो. उतरवितो. राष्ट्रगीतही म्हणतो. शाळेतून बाहेर पडल्यानंतर यानिमित्ताने पुन्हा मागील ४ वर्षांपासून राष्ट्रगीत म्हणण्याचा योग असा आला आहे.