शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जायकवाडीत २४ तासांत दीड टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:35 IST

गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककडून येणाºया पाण्याचा ओघ वाढला आहे.गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरण ८६.५४ टक्के भरले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान पावसाने मोठी दडी मारल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आॅगस्ट महिनाअखेर अतिवृष्टी झाल्यामुळे जायकवाडीच्या पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली.शनिवारी सकाळपर्यंत जायकवाडीमध्ये १८ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, धरणात ६६.३४ टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. विशेष म्हणजे जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण आवक ६३.८३ टीएमसी झालेली आहे. जायकवाडीने ९४ टक्के पातळी ओलांडल्यावरच विसर्ग करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे कडा कार्यालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांच्या संदर्भाने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. ते म्हणाले की, नाशिककडून प्रतिदिन ३५ ते ४० हजार क्युसेक पाण्याची आवक झाली तर जायकवाडीची पातळी झपाट्याने वाढून पाणी सोडण्याचा विचार करावा लागेल; मात्र सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू नाही. त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अजून कालावधी बाकी आहे.