शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जायकवाडीत २४ तासांत दीड टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:35 IST

गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असून, नाशिककडून येणाºया पाण्याचा ओघ वाढला आहे.गेल्या चोवीस तासांमध्ये जायकवाडीमध्ये १.५६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून, धरण ८६.५४ टक्के भरले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान पावसाने मोठी दडी मारल्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आॅगस्ट महिनाअखेर अतिवृष्टी झाल्यामुळे जायकवाडीच्या पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली.शनिवारी सकाळपर्यंत जायकवाडीमध्ये १८ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, धरणात ६६.३४ टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. विशेष म्हणजे जून महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण आवक ६३.८३ टीएमसी झालेली आहे. जायकवाडीने ९४ टक्के पातळी ओलांडल्यावरच विसर्ग करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे कडा कार्यालयाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांच्या संदर्भाने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. ते म्हणाले की, नाशिककडून प्रतिदिन ३५ ते ४० हजार क्युसेक पाण्याची आवक झाली तर जायकवाडीची पातळी झपाट्याने वाढून पाणी सोडण्याचा विचार करावा लागेल; मात्र सध्या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू नाही. त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी अजून कालावधी बाकी आहे.