शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

पाच वर्षांपासून जिल्ह्यातील दीडशे गटसचिव पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:02 IST

फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यातील गटसचिवांना मागील पाच ते सहा वर्षांपासून पगार मि‌ळत नसल्याने त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. ...

फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यातील गटसचिवांना मागील पाच ते सहा वर्षांपासून पगार मि‌ळत नसल्याने त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यातील एका गटसचिवाने तर मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली.

ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहीजे. याकरिता प्रथम शेतकरी वर्ग समोर ठेवून सहकार सोसायटीच्या स्थापना करण्यात आल्या. या सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अर्थ पुरवठा करण्याचे काम सुरू झाले. वर्षातून दोनवेळा खरीप व रब्बी पिकाच्या लागवडीकरिता शेतकऱ्यांना बियाणे, खते घेण्याकरिता कर्ज मिळू लागले. या संस्था शेतकऱ्यांविना अनेक वर्ष वरदान ठरल्या. पण काही वर्षांपासून कर्जमाफीचे वारे सुरू झाल्याने या संस्था डबघाईस येण्यास सुरूवात झाली आहे. याला काही प्रमाणात राजकारण जबाबदार ठरत आहे. या संस्थामध्ये जिल्हाभरात २७९ गटसचिव कार्यरत असून, त्यापैकी १३२ जणांचा पगार थांबला आहे. त्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याचाच भाग म्हणून एका गटसचिवाने थेट मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली.

--

दोन टक्के रक्कम जमा झालीच नाही

जिल्हा बँक सहकार सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करते. ते कर्ज वसूल झाल्यानंतर वसुलीची २ टक्के रक्कम देखरेख संघाला जाते. या रकमेतून देखरेख संघ गटसचिवांचा पगार करते. अशा प्रकारचे कामकाज सहकारमध्ये चालते. पण २ टक्के रक्कम जमा झाली नाही. म्हणून पगार ही झाला नाही.

--

इच्छामरणाची केली मागणी

मागील दोन वर्षांपासून माझे दहा पगार थांबलेले आहे. परिणामी माझी व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कुटुंबाचा गाडा चालविणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे, असे गटसचिव विजय फसाटे यांनी सांगितले.

--

कोट

जिल्ह्यातील १३२ गटसचिवाचे गेल्या वर्षांपासून पगार झालेले नाही. त्यांना ११ कोटी रुपये पगार पोटी येणे आहे. याचा परिणाम कुटुंबावर झालेला असून, या संदर्भात विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना पत्र दिले असून सचिवाच्या पगाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

- मारोती जाधव, गटसचिव संघटनेचे, जिल्हाध्यक्ष

--

कोट

काही सहकार संस्थाकडून २ टक्के प्रमाणे रक्कम जमा झाली. या कारणास्तव पगार थांबले. गटसचिव संघटनेचे पगार संदर्भात पत्र मिळालेले आहे. या संदर्भात माहिती घेणे सुरू आहे. आलेल्या पत्राचा हवाला देऊन ते जिल्हा बँकेकडे निर्णयाबाबत पाठविण्यात आले आहे.

- ए. आर. अकुलकर, सचिव, जिल्हा देखरेख संघ