शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून जिल्ह्यातील दीडशे गटसचिव पगाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:02 IST

फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यातील गटसचिवांना मागील पाच ते सहा वर्षांपासून पगार मि‌ळत नसल्याने त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. ...

फुलंब्री : औरंगाबाद जिल्ह्यातील गटसचिवांना मागील पाच ते सहा वर्षांपासून पगार मि‌ळत नसल्याने त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यातील एका गटसचिवाने तर मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली.

ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहीजे. याकरिता प्रथम शेतकरी वर्ग समोर ठेवून सहकार सोसायटीच्या स्थापना करण्यात आल्या. या सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर अर्थ पुरवठा करण्याचे काम सुरू झाले. वर्षातून दोनवेळा खरीप व रब्बी पिकाच्या लागवडीकरिता शेतकऱ्यांना बियाणे, खते घेण्याकरिता कर्ज मिळू लागले. या संस्था शेतकऱ्यांविना अनेक वर्ष वरदान ठरल्या. पण काही वर्षांपासून कर्जमाफीचे वारे सुरू झाल्याने या संस्था डबघाईस येण्यास सुरूवात झाली आहे. याला काही प्रमाणात राजकारण जबाबदार ठरत आहे. या संस्थामध्ये जिल्हाभरात २७९ गटसचिव कार्यरत असून, त्यापैकी १३२ जणांचा पगार थांबला आहे. त्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याचाच भाग म्हणून एका गटसचिवाने थेट मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून मला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली.

--

दोन टक्के रक्कम जमा झालीच नाही

जिल्हा बँक सहकार सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करते. ते कर्ज वसूल झाल्यानंतर वसुलीची २ टक्के रक्कम देखरेख संघाला जाते. या रकमेतून देखरेख संघ गटसचिवांचा पगार करते. अशा प्रकारचे कामकाज सहकारमध्ये चालते. पण २ टक्के रक्कम जमा झाली नाही. म्हणून पगार ही झाला नाही.

--

इच्छामरणाची केली मागणी

मागील दोन वर्षांपासून माझे दहा पगार थांबलेले आहे. परिणामी माझी व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कुटुंबाचा गाडा चालविणेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे, असे गटसचिव विजय फसाटे यांनी सांगितले.

--

कोट

जिल्ह्यातील १३२ गटसचिवाचे गेल्या वर्षांपासून पगार झालेले नाही. त्यांना ११ कोटी रुपये पगार पोटी येणे आहे. याचा परिणाम कुटुंबावर झालेला असून, या संदर्भात विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक यांना पत्र दिले असून सचिवाच्या पगाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

- मारोती जाधव, गटसचिव संघटनेचे, जिल्हाध्यक्ष

--

कोट

काही सहकार संस्थाकडून २ टक्के प्रमाणे रक्कम जमा झाली. या कारणास्तव पगार थांबले. गटसचिव संघटनेचे पगार संदर्भात पत्र मिळालेले आहे. या संदर्भात माहिती घेणे सुरू आहे. आलेल्या पत्राचा हवाला देऊन ते जिल्हा बँकेकडे निर्णयाबाबत पाठविण्यात आले आहे.

- ए. आर. अकुलकर, सचिव, जिल्हा देखरेख संघ