शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

२५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

हणमंत गायकवाड , लातूर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़

हणमंत गायकवाड , लातूरवसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़ आता तर २५१ प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे़ लाभार्थ्यांच्या जातीतही घोळ केला असून, एका प्रकरणात वेगळी तर दुसऱ्या प्रकरणात दुसरीच जात दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना प्रकरणनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली़ लातुरातही या महामंडळामार्फत २००२ पासून २०१४ पर्यंत हजारो लाभार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज वितरित करण्यात आले़ परंतु, वाटप करणारी यंत्रणा पारदर्शक नसल्याचे अनेक उदाहरणे घडले आहेत़ आता माहितीच्या अधिकारात २५१ प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ एकाच व्यक्तीची जातही वेगवेगळी दाखविली आहे़ धनादेश क्रमांकामध्ये व रक्कमेमध्ये फरकही आहे़ त्यातच कोणत्याही कर्ज प्रकरणाची वसुली झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड यांना लोदगा लातूरचा रहिवाशी दाखवून त्यांची जात जोशी दाखविली आहे़ त्यांना शेळी प्रकरणात शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे ४०१०६ धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ तर याच नावावर लोदगा औसा भोई जात दर्शवून शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे कर्ज ४०१०५ या धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ लातूर तालुक्यात लोदगा गाव नाही मात्र औसा तालुक्यात आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड नेमके कोणत्या गावचे, कोणत्या तालुक्याचे आणि कोणत्या गावचे हे स्पष्ट नाही़ माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत सामाजिक कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली़ मात्र महामंडळाकडून खुलासा झाली नाही़ त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़ एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज व जात वेगळी, गाव वेगळे दाखवून २५१ कर्ज प्रकरणात कर्ज वितरीत केलेल्या प्रकरणाची संख्या १४ असून, हा घोळ एकट्या लातूर कार्यालयातला आहे़ संशय असलेल्या २५१ प्रकरणात १४ कोटी ८० लाख रूपयांचे कर्ज वितरित झाले आहे़ या प्रकरणात ना वसुली ना लाभार्थ्यांचा ठावठिकाणा अशीच परिस्थितीच आहे़ मागे एकदा अस्तित्वात नसलेल्या आणि त्या गावाचा रहिवाशी नसलेल्या एका नावावर कर्ज वसुलीची नोटीस या महामंडळाने पाठविली होती़ संबंधित ग्रामपंचायतीने अशा नावाचा व्यक्ती आमच गावात राहत नाही, राहत नव्हता, मागे कधीही नव्हता असा खुलासा केल्यानंतरही महामंडळाने स्वत:चीच वाजवून घेत आमचेच खरे असल्याचा दावा केला होता़ आता या २५१ प्रकरणांतही एकाच नावाची दोन व्यक्ती असू शकतात, असा खुलासा महामंडळ करीत आहे. जातीच्या घोळाबाबत मात्र वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाने कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अपराध शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे.