शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

२५१ प्रकरणांत एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज

By admin | Updated: April 28, 2015 00:30 IST

हणमंत गायकवाड , लातूर वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़

हणमंत गायकवाड , लातूरवसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाचे लातूर कार्यालय वेगवेगळ्या प्रकरणांनी बहुचर्चित झाले आहे़ आता तर २५१ प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे़ लाभार्थ्यांच्या जातीतही घोळ केला असून, एका प्रकरणात वेगळी तर दुसऱ्या प्रकरणात दुसरीच जात दर्शविल्याचे निदर्शनास आले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना प्रकरणनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ भटक्या विमुक्त जाती-जमातीतील लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली़ लातुरातही या महामंडळामार्फत २००२ पासून २०१४ पर्यंत हजारो लाभार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी कर्ज वितरित करण्यात आले़ परंतु, वाटप करणारी यंत्रणा पारदर्शक नसल्याचे अनेक उदाहरणे घडले आहेत़ आता माहितीच्या अधिकारात २५१ प्रकरणात एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ एकाच व्यक्तीची जातही वेगवेगळी दाखविली आहे़ धनादेश क्रमांकामध्ये व रक्कमेमध्ये फरकही आहे़ त्यातच कोणत्याही कर्ज प्रकरणाची वसुली झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड यांना लोदगा लातूरचा रहिवाशी दाखवून त्यांची जात जोशी दाखविली आहे़ त्यांना शेळी प्रकरणात शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे ४०१०६ धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ तर याच नावावर लोदगा औसा भोई जात दर्शवून शेळी व्यवसायासाठी १० हजाराचे कर्ज ४०१०५ या धनादेश क्रमांकाने कर्ज वितरित केले आहे़ लातूर तालुक्यात लोदगा गाव नाही मात्र औसा तालुक्यात आहे़ नरसिंग लक्ष्मण गायकवाड नेमके कोणत्या गावचे, कोणत्या तालुक्याचे आणि कोणत्या गावचे हे स्पष्ट नाही़ माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत सामाजिक कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली़ मात्र महामंडळाकडून खुलासा झाली नाही़ त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़ एकाच व्यक्तीला दोन वेळा कर्ज व जात वेगळी, गाव वेगळे दाखवून २५१ कर्ज प्रकरणात कर्ज वितरीत केलेल्या प्रकरणाची संख्या १४ असून, हा घोळ एकट्या लातूर कार्यालयातला आहे़ संशय असलेल्या २५१ प्रकरणात १४ कोटी ८० लाख रूपयांचे कर्ज वितरित झाले आहे़ या प्रकरणात ना वसुली ना लाभार्थ्यांचा ठावठिकाणा अशीच परिस्थितीच आहे़ मागे एकदा अस्तित्वात नसलेल्या आणि त्या गावाचा रहिवाशी नसलेल्या एका नावावर कर्ज वसुलीची नोटीस या महामंडळाने पाठविली होती़ संबंधित ग्रामपंचायतीने अशा नावाचा व्यक्ती आमच गावात राहत नाही, राहत नव्हता, मागे कधीही नव्हता असा खुलासा केल्यानंतरही महामंडळाने स्वत:चीच वाजवून घेत आमचेच खरे असल्याचा दावा केला होता़ आता या २५१ प्रकरणांतही एकाच नावाची दोन व्यक्ती असू शकतात, असा खुलासा महामंडळ करीत आहे. जातीच्या घोळाबाबत मात्र वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाने कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अपराध शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केली आहे.