शहरं
Join us  
Trending Stories
1
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
2
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
3
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
4
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
5
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
6
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
7
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
8
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
9
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
10
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
11
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
12
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
13
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
14
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
15
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
16
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
17
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

जनावरांच्या बाजारामुळे समितीला उर्जीतावस्था

By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST

परंडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुरु करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असून,

परंडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुरु करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, याद्वारे मिळणाऱ्या करामुळे डबघाईस आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीलाही उर्जीतावस्था आल्याचे दिसत आहे. सीना-कोळेगाव धरणामुळे सिंचनक्षेत्रात वाढ होत असतानाच अत्यल्प पावसामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला. याचा परिणाम शेती उत्पादनावर होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीलाही याचा फटका सहन करावा लागला. केवळ तीन ते चार व्यापाऱ्यांवर बाजार समितीचा कारभार सुरू होता. यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही बाजार समितीला कठीण जात होते. परंतु, दीड वर्षांपासून चालू करण्यात आलेल्या कांदा आडत व जनावरांचा बाजार यामुळे आवक वाढून मिळणाऱ्या कर उत्पन्नातून बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारताना दिसत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी कुठल्याही जनावराची खरेदी-विक्री करायची म्हटले तरी वालवड, कुर्डूवाडी, बार्शी अशा दूरच्या अंतरावर जावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. वास्तविक दर रविवारी परंडा येथे भाजी-पाल्याचा आठवडी बाजार भरतो. यासाठी परिसरातील अनेक गावातून व्यापारी व ग्राहक येथे येतात. त्यामुळे याच दिवशी कांदा आडत आणि जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आणि दीड वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. येथे कांद्याला योग्य दर मिळत असल्याने तालुक्यासह शेजारील तालुक्यातूनही अनेक कांदा उत्पादक येथील आडतीवर आपला कांदा घालू लागले. या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या. तसेच व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कराच्या माध्यमातून बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडली. तसेच जनावरांच्या बाजारातूनही लाखो रुपयांची विक्री होत आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे बैलांची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे रविवारच्या (२४ मे) बाजारात दिसून आले. पन्नास हजारांपासून बैलजोड्यांच्या किंमती होत्या. विविध ठिकाणाहून शेतकरी, व्यापारी येथे जनावरांच्या खेरेदी-विक्रीसाठी आले होते. एकूणच जनावरांचा बाजार आणि कांदा आडत चालू करण्याचा निर्णय बाजार समितीला फायद्याचा ठरला असून, यातून समितीची आर्थिक स्थिती सुधारत आहे. पूर्वी जनावरे खरेदी करण्यासाठी वालवड, बार्शी किंवा कुर्डवाडी या ठिकाणी जावे लागत होते. परंतु, मागील वषार्पासून परंडा बाजार समितीने जनावरांबाजार सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाल्याचे अनिल शिंदे, रोपळे (ता. माढा) येथील अशोक आटकले यांनी सांगितले. (वार्ताहर)