शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

जुन्याच ग्रामपंचायती नव्याने आराखड्यात

By admin | Updated: April 16, 2016 00:10 IST

संजय तिपाले ल्ल बीड स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षासाठी तयार केलेल्या आराखड्यात शंभराहून अधिक ग्रामपंचायती जुन्याच असल्याची माहिती समोर आली आहे.

३२० गावांची निवड : १०७ कोटींचा निधी; ७९ हजारावर शौचालये बांधण्याचे उद्दिष्टसंजय तिपाले ल्ल बीडस्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने २०१६-१७ या वर्षासाठी तयार केलेल्या आराखड्यात शंभराहून अधिक ग्रामपंचायती जुन्याच असल्याची माहिती समोर आली आहे. शौचालय योजनेत सहभाग नोंदवून अर्धवट कामे करत पाणंदमुक्तीपासून दूर राहिलेल्या ग्रामपंचायतींना पुन्हा संधी दिल्याने नव्या ग्रामपंचायती वंचित राहण्याची शक्यता आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा शौचालयांचे उद्दिष्ट तिपटीने वाढले आहे. १०७ कोटी रुपये खर्च करुन सुमारे ७९ हजार ४११ शौचालये बांधण्यात येणार आहेत. गतवर्षी १०५ गावांचा वार्षिक आराखड्यात समावेश होता. ३३ हजार ८९ शौचालये बांधण्याचे लक्ष्य होते. हे लक्ष्य साध्य करुन बीड जिल्ह्याने मराठवाड्यात तृतीय तर राज्यात सातवे स्थान पटकावले. शौचालय योजनेत तळाशी असलेला बीड जिल्हा पहिल्यांदाच राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांत आपले स्थान निश्चत करु शकला आहे. तथापि, नव्या वर्षात शौचालय योजना अधिक गतिमान केली जाणार आहे. त्यासाठी आराखडा अंतिम करण्यात आला आहे. सर्वच गावे पाणंदमुक्त करण्याचा संकल्प पाणी व स्वच्छता विभागाने केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२५ शौचालयांच्या खोदकामांचे ‘मार्किंग’ केले आहे. ३२० गावांपैकी ४१ गावांत मग्रारोहयोतून तर उर्वरित गावांत स्वच्छता मिशनकडून कामे केली जातील. आराखड्याबाहेरची गावे शंभर टक्के पाणंदमुक्त झाल्यास ते अनुदानपात्र राहतील, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.तालुकानिहाय गावेअंबाजोगाई: २८, आष्टी : २६, बीड : ३५, गेवराई: ४४, शिरुर: १५, माजलगाव: ३०, केज: २४, परळी: २५, पाटोदा १०धारुर, वडवणी शंभर टक्के !धारुर व वडवणी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचा आराखड्यात समावेश आहे. धारुर तालुक्यात ५१ तर वडवणी तालुक्यात ३२ ग्रामपंचायती आहेत.ज्या गावांत थोडीफार कामे झाली आहेत, त्या गावांना प्राधान्याने नव्या आराखड्यात संधी द्यावी, असे शासनानेच धोरण आहे. त्यानुसार जुन्या गावांना पुन्हा संधी दिलेली आहे. जी गावे स्वत:हून पुढे येतील, त्यांचे स्वागतच आहे. योजना प्रभावीपणे राबविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत.- नामदेव ननावरे, सीईओ, जि.प.