शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

स्वस्त धान्य दुकानांत जुन्या पद्धतीनेच धान्य वाटप

By admin | Updated: May 20, 2017 00:49 IST

जालना: अद्याप अनेक दुकानांमधून ई-पॉस ऐवजी पारंपरिक पद्धतीनेच धान्य वितरण होत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी लाभार्थींना ई-पॉस मशिनद्वारेच धान्य वाटप करण्याचे जिल्हापुरवठा विभागाने कडक आदेश दिले असले तरी अद्याप अनेक दुकानांमधून ई-पॉस ऐवजी पारंपरिक पद्धतीनेच धान्य वितरण होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक दुकानदारांकडे मशिन असली तरी तांत्रिक दोष सांगून वापर बंद असल्याचे शुक्रवारी आठ ते दहा स्वस्तधान्य दुकानांत केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले. जालना तालुक्यात २०९ स्वस्तधान्य दुकाने असून, पैकी शंभरपेक्षा अधिक दुकाने शहरात आहेत. शुक्रवारी काही दुकानांमध्ये पाहणी केली असता ईपॉसचा वापराकडे कानाडोळा अथवा त्याचा वापर मर्यादित होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक लाभार्थीला ईपॉसद्वारेच धान्य वाटप करण्याचे आदेश आहेत. सर्व दुकानदारांना ईपॉस मशिन देऊन प्रशिक्षणही दिले आहे.शहरातील दुकानांमधून तीस ते चाळीस टक्के धान्य ईपॉसद्वारे तर साठ टक्के धान्य जुन्या पद्धतीनेच वितरित होत आहे. त्यामुळे ईपॉसचा वापर होतो का बंद पडतो, असा प्रश्न आहे. प्रत्येक दुकनदाराकडे शंभर ते सव्वाशे लाभार्थी जोडलेले आहेत.शुक्रवारी विविध दुकानांतून धान्याचे वितरण सुरू होते. मात्र ईपॉसचा वापर मर्यादित दिसून आला. ईपॉस वापराबाबत अनेक दुकानदारांना साशंकता असल्याचे या स्टिंग आॅपरेशमधून स्पष्ट झाले. ईपॉस मशिन वापराकडे स्वस्तधान्य दुकानदार टाळाटाळ करीत आहेत. परिणामी धान्याची नोंद अथवा किती धान्य वाटप झाले याचा मेळ लागत नाही.