शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोज ६ नवे टीबी रुग्ण, किती दिवसांपासून खोकला? लक्ष ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:37 IST

जागतिक क्षयरोग दिन विशेष: वर्षभरात जिल्ह्यात तब्बल २ हजार ९७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर : नुसते टीबी म्हणजे क्षयरोगाचे नावही ऐकले तरी आजही अनेकांना धडकी भरते. देश क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केला जात आहे. तरीही जिल्ह्यात दररोज ५ ते ६ नवीन क्षयरुग्ण आढळत आहेत. वर्षभरात जिल्ह्यात तब्बल २ हजार ९७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

‘टीबीमुक्त भारत’ अभियानानुसार २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने हेच उद्दिष्ट २०३० साठी निश्चित केले असले तरी भारताने हे लक्ष्य पाच वर्षे आधी साध्य करण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे सांगितले जाते. या मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीसीजी लसीकरणात मोठी कामगिरी केली गेली. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५ टक्के बीसीजी लसीकरण हे जिल्ह्यात झाले आहे. दोन आठवड्यांहून अधिक कालावधीचा खोकला, हे क्षयरोगाचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे जाणवल्यास वेळीच खबरदारी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

क्षयरोगाची प्रमुख लक्षणे- सलग दोन आठवडे किंवा अधिक काळ खोकला- छातीत वेदना आणि श्वास घेताना त्रास- वजन अचानक कमी होणे- रात्री घाम येणे आणि थकवा

उपचार यश दर ८९ टक्केराज्यात नवीन क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आला आहे. याबरोबर जिल्ह्याचा टीबी उपचार यश दर ८९ टक्के असून, हा दर राज्यातील उत्कृष्ट कामगिरी दर्शवितो. रुग्णांच्या संपर्कातील सर्व कुटुंबीय, नातेवाईक, इतर व्यक्तींची तपासणी केली जाते. त्यातून क्षयरोगाचा संसर्ग वेळीच शोधून प्रतिबंधक उपाययोजना करता येतात.-डाॅ. वैशाली डकले-पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी

वर्षभरात कुठे किती नवे क्षयरुग्ण? (२०२४)तालुका- रुग्णसंख्याछत्रपती संभाजीनगर- ५४५गंगापूर- २४७कन्नड- २२०खुलताबाद- ११७पैठण- २५२फुलंब्री- १२७सिल्लोड- २८८सोयगाव- ८८वैजापूर- २१३एकूण- २०९७

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य