शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

अधिकारीही आता खेड्यात मुक्कामाला

By admin | Updated: June 16, 2014 00:13 IST

पाथरी : जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करून जनतेशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात असतानाच

पाथरी : जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करून जनतेशी संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबविला जात असतानाच आता तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस तालुक्यातील एका खेड्यामध्ये मुक्काम करावा लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी नुकतेच काढले आहेत. ग्रामीण भागातील जनतेशी प्रशासनाचा सुसंवाद साधला जावा, नागरिकांच्या समस्या सुटाव्यात या उद्देशाने जिल्हाभरामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एका गावात जनसंवाद कार्यक्रम गावात मुक्कामी राहून करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. समस्यांचे निराकरण होतानाही दिसून येत आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या या जनसंपर्क अभियानानंतर आता तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस खेड्यामध्ये मुक्काम करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच काढले आहेत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना आठवड्याच्या मुक्कामी राहण्याच्या गावचे आता नियोजन करावे लागणार आहे. प्रशासनाने हा कार्यक्रम हाती घेतला असला तरी यासाठी तालुकास्तरावरून अधिकारी आणि जनतेचा किती प्रतिसाद मिळतो? यावरच या नवीन अभियानाचे यश अवलंबून आहे. (वार्ताहर)नागरिकांची अरेरावीप्रशासनाने जिल्हाभरातील खेड्यांमध्ये अधिकारी जनतेशी संवाद साधण्यासाठी मुक्काम करीत आहेत. नागरिकांसोबत चर्चाही केली जात आहे, असे असतानाही काही हौशा नागरिकांकडून मात्र अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी अरेरावी केली जात असल्याचे प्रकारही निदर्शनात येत आहे.