शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

अधिकारी ‘मिटींग’मध्ये, शेतकरी ‘वेटींग’वर

By admin | Updated: June 19, 2017 23:51 IST

जालना:थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: निकषांवर आधारित पीककर्ज माफीच्या घोषनेनंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे एकीकडे अधिकाऱ्यांचा बैैठकांमध्ये खल सुरू होता, तर शेतकरी अग्रीम रकमेच्या वेटिंगवर असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ३० जून २०१६ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी दहा हजारांचे तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने १४ जून २०१७ रोजी घेतला. यासाठीचे आदेशही जिल्हा मध्यवर्ती, व्यापारी व ग्रामीण बँकांना प्राप्त झाले आहेत. परंतु जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या अद्याप निश्चित नसल्यामुळे अग्रीम दहा हजार रुपयांचे वाटप कशा पद्धतीने करायचे याबाबत अधिकारी संभ्रमात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार सभासदांची संख्या जवळपास ८३ हजार आहे. यात पीक कर्जाचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजारांवर आहे. या शेतकऱ्यांना अग्रीम दहा हजारांचा मिळू शकतो, परंतु जिल्हा बँकेकडे वाटपासाठी पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शिवाय थेट शपथपत्र घेऊन दहा हजारांचे वाटप करायचे, की शासन आदेशानुसार निकषांची तपासणी करावयाची याबाबत बँकेच्या संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक डब्लू. एस. कदम यांनी सांगितले. ३१ मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या जुन्या व नव्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख बारा हजार आहे. शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे बँकांकडून जून २०१६ अखेरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, अग्रीम दहा हजार वाटपासाठी कोणते निकष वापरायचे यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र, बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतरच अग्रीम दहा हजारांचे वाटप केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे जबाबदार अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.