शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी ‘मिटींग’मध्ये, शेतकरी ‘वेटींग’वर

By admin | Updated: June 19, 2017 23:51 IST

जालना:थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: निकषांवर आधारित पीककर्ज माफीच्या घोषनेनंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे एकीकडे अधिकाऱ्यांचा बैैठकांमध्ये खल सुरू होता, तर शेतकरी अग्रीम रकमेच्या वेटिंगवर असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ३० जून २०१६ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी दहा हजारांचे तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने १४ जून २०१७ रोजी घेतला. यासाठीचे आदेशही जिल्हा मध्यवर्ती, व्यापारी व ग्रामीण बँकांना प्राप्त झाले आहेत. परंतु जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या अद्याप निश्चित नसल्यामुळे अग्रीम दहा हजार रुपयांचे वाटप कशा पद्धतीने करायचे याबाबत अधिकारी संभ्रमात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार सभासदांची संख्या जवळपास ८३ हजार आहे. यात पीक कर्जाचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजारांवर आहे. या शेतकऱ्यांना अग्रीम दहा हजारांचा मिळू शकतो, परंतु जिल्हा बँकेकडे वाटपासाठी पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शिवाय थेट शपथपत्र घेऊन दहा हजारांचे वाटप करायचे, की शासन आदेशानुसार निकषांची तपासणी करावयाची याबाबत बँकेच्या संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक डब्लू. एस. कदम यांनी सांगितले. ३१ मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या जुन्या व नव्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख बारा हजार आहे. शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे बँकांकडून जून २०१६ अखेरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, अग्रीम दहा हजार वाटपासाठी कोणते निकष वापरायचे यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र, बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतरच अग्रीम दहा हजारांचे वाटप केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे जबाबदार अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.