शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अधिकारी ‘मिटींग’मध्ये, शेतकरी ‘वेटींग’वर

By admin | Updated: June 19, 2017 23:51 IST

जालना:थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: निकषांवर आधारित पीककर्ज माफीच्या घोषनेनंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांमधून दहा हजारांची अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, सहा दिवसानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे एकीकडे अधिकाऱ्यांचा बैैठकांमध्ये खल सुरू होता, तर शेतकरी अग्रीम रकमेच्या वेटिंगवर असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ३० जून २०१६ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरिपासाठी दहा हजारांचे तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने १४ जून २०१७ रोजी घेतला. यासाठीचे आदेशही जिल्हा मध्यवर्ती, व्यापारी व ग्रामीण बँकांना प्राप्त झाले आहेत. परंतु जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या अद्याप निश्चित नसल्यामुळे अग्रीम दहा हजार रुपयांचे वाटप कशा पद्धतीने करायचे याबाबत अधिकारी संभ्रमात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार सभासदांची संख्या जवळपास ८३ हजार आहे. यात पीक कर्जाचे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजारांवर आहे. या शेतकऱ्यांना अग्रीम दहा हजारांचा मिळू शकतो, परंतु जिल्हा बँकेकडे वाटपासाठी पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शिवाय थेट शपथपत्र घेऊन दहा हजारांचे वाटप करायचे, की शासन आदेशानुसार निकषांची तपासणी करावयाची याबाबत बँकेच्या संचालक मंडळ निर्णय घेणार असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक डब्लू. एस. कदम यांनी सांगितले. ३१ मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या जुन्या व नव्या थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख बारा हजार आहे. शासन निर्णयानुसार ३० जून २०१६ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे बँकांकडून जून २०१६ अखेरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, अग्रीम दहा हजार वाटपासाठी कोणते निकष वापरायचे यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक, राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र, बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतरच अग्रीम दहा हजारांचे वाटप केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे जबाबदार अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.