शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:17 IST

ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ऐन सण- उत्सवाच्या काळातही महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयाचा गलथान कारभार सुरूच आहे. गणेश चतुर्थीपासून सातत्याने या भागात वीजपुरवठा खंडित होत असून शनिवारी रात्रभर खंडित झालेला वीजपुरवठा रविवारीही दिवसभर सुरळीत झाला नव्हता.एमआयडीसी कार्यालयांतर्गत असलेल्या वीज ग्राहकांना या कार्यालयाच्या गलथान कारभाराचा मोठा फटका मागील चार महिन्यांपासून बसत आहे. दररोज या भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत कर्मचाºयांकडूनही ग्राहकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अबालवृद्धांची गैरसोय होत आहे.शुक्रवारी श्री गणरायाचे आगमन मोठ्या थाटात झाले. नवीन नांदेड भागात जवळपास दोनशेंहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. पहिल्याच दिवशी रात्री वीजपुरवठा खंडित झाला. तो कसाबसा रात्री उशिरा सुरू केला. दुसºया दिवशीही तोच कित्ता महावितरणने गिरवला.एमआयडीसी कार्यालयांतर्गत येणाºया वसरणी, दूध डेअरी, महसूल कॉलनी, शिवशंकरनगर, यशोधरानगर आदी भागात दररोज या ना त्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत महावितरणकडून लोड जास्त झाल्याचे कारण दिले जात आहे. या भागातील वीज व्यवस्था सुधारण्यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नाही. या भागात महावितरणने पावसाळापूर्व कामे केलीत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भागातील रोहित्रही अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत. त्याकडेही महावितरणने दुर्लक्ष केले आहे. वसरणी ते नावघाट पूल या दरम्यानचे विद्युत पोल कधीही कोसळतील, अशा अवस्थेत आहेत. याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही.