शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

मनपा प्रशासनाचा पदाधिकाऱ्यांना ठेंगा

By admin | Updated: August 24, 2016 00:50 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प पडलेला असताना मागील काही दिवसांपासून महापालिकेत प्रशासनाविरुद्ध

औरंगाबाद : शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. ११५ वॉर्डांमधील विकास ठप्प पडलेला असताना मागील काही दिवसांपासून महापालिकेत प्रशासनाविरुद्ध पदाधिकारी असा सामना रंगला. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे आयुक्त गैरहजर होते. अतिरिक्त आयुक्तांनीही पाठ फिरविली. त्यामुळे संताप अनावर झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार तोफ डागली. सर्वसाधारण सभा, स्थायी समितीने दिलेल्या सूचनांना प्रशासनाकडून चक्क केराची टोपली दाखविण्यात येत असेल तर बैठक कशासाठी घ्यायची.... बैठक तहकूब करा...जोपर्यंत स्वत: आयुक्त येणार नाहीत, तोपर्यंत बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.मागील काही दिवसांपासून मनपा प्रशासनाचे एकला चलो रे....धोरण सुरू झाले आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील संवाद खुंटला आहे. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू आहे. शहरातील सुजाण नागरिकांनी आम्हाला विकासकामे करण्यासाठी महापालिकेत पाठविले आहे. प्रशासन आमचे म्हणणे ऐकतच नसेल तर काय उपयोग अशी भावना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये वाढू लागली आहे. कोणतेही विकास काम सांगितले तर निधी नाही....एवढेच सांगण्यात येते. निधी कसा उभा करावा याचाही मार्ग पदाधिकाऱ्यांनी दाखविला. त्यावरही अंमलबजावणी करण्यास प्रशासन तयार नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात संघर्षाचा भडका उडत आहे.मंगळवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू झाली. बैठकीस मोठ्या उत्साहाने सर्व नगरसेवक उपस्थित होते. मनपा आयुक्त नेहमीच बैठकीला येत नाहीत. आजही ते आले नाहीत. अतिरिक्त आयुक्त रमेश पवारही गैरहजर दिसले. त्यांच्या जागेवर उपायुक्त रवींद्र निकम यांना प्राधिकृत करण्यात आले होते. निकम यांना आयुक्तांच्या खुर्चीवर पाहून सदस्यांची सटकली. नगरसेवक सीताराम सुरे यांनी आयुक्त बैठकीस उपस्थित राहणार नसतील तर आमची येथे चर्चा निरर्थक आहे. आमचे दु:ख, गाऱ्हाणे कोण ऐकणार आहे. उपायुक्त निकम यांना कारवाईचे अधिकारच नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आयुक्त ओम प्रकाश बकोरिया स्वत: येत नाहीत तोपर्यंत बैठक तहकूब करा अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. सभापती मोहन मेघावाले यांनी बैठक तहकूब केली. २६ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता तहकूब बैठक घेण्यात येणार आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे मंगळवारी सकाळीच मनपात दाखल झाले. त्यांनी स्थायी समितीमधील शिवसेनेच्या सदस्यांसोबत बैठक घेतली. यापूर्वी काही सेना नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घातला होता. सेनेचे सभापती असताना पक्षातील नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घातल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. दानवे यांनी सर्व सदस्यांना योग्य त्या सूचना दिल्या. पक्षात कसे वागावे याची माहिती दिली. ऐनवेळीच्या मुद्यावरून काही नगरसेवक नाराज होते, त्यांची नाराजी दूर केल्याचेही दानवे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.