शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आठवड्याला पाणी, प्रस्ताव स्थायीला सादर

By admin | Updated: August 20, 2014 23:53 IST

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला

नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला असून स्थायीच्या सभेत यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सभापती उमेश पवळे यांनी दिली़ पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ यंदाही एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आला नाही़ तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाची पाणीपातळीही वाढली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो़ या प्रकल्पात उन्हाळ्यात ४० दलघमी पाणी उपलब्ध होते़ त्यामुळे जुन महिन्यापर्यंत शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात आले़ मात्र पावसाळ्यात एकाही नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ७ टक्के जलसाठा उपलब्ध राहिल्याने नांदेड शहराच्या पाणी कपातीचा निर्णय मनपाने घेतला़ त्यानंतर १३ जुलैपासून शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात आला़ दरम्यान, दिग्रस बंधाऱ्यातून ९ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात आले़ या पाण्यामुळे विष्णूपुरी प्रकलत १५ दलघमी पाणी साठा निर्माण झाला़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात ९ दलघमी पाणी उपलब्ध असून हे पाणी दोन दिवसआड सोडल्यास ४५ दिवस पुरणार आहे़ याविषयी महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचे संकेत दिले होते़ पाणी बचतीचे धोरण स्वीकारून पुढील दोन, तीन, महिने हा साठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासंदर्भात बुधवारी मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला़ येत्या २५ आॅगस्ट रोजी स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावावर निर्णय होणार असल्याचे सभापती उमेश पवळे यांनी सांगितले़ दरम्यान, महापालिकेने पाणी बचतीचे धोरण राबविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे़ बांधकामासाठी, वाहने धुणे, रस्त्यावर पाणी टाकणे यावर निर्बंध घातले आहेत़ (प्रतिनिधी)