शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

विनयभंग करणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि चार हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:04 IST

(अपेक्षित ५ स्टार) औरंगाबाद : पाणी आणण्‍यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करणारा किशोर कैलास बैनाडे (रा. बेंदेवाडी, ता. औरंगाबाद) याला ...

(अपेक्षित ५ स्टार)

औरंगाबाद : पाणी आणण्‍यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करणारा किशोर कैलास बैनाडे (रा. बेंदेवाडी, ता. औरंगाबाद)

याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी ६ महिन्यांचा कारावास आणि ४ हजार रुपये दंड सुनावला. दंडाच्या रकमेपैकी ३ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे.

काय होता खटला?

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार ११ जून २०१६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ती घरापासून काही अंतरावर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी किशोर कैलास बैनाडे याने तिचे तोंड दाबून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिला धमकावले. महिलेचा पती व सासरा धावत आले. त्यांनाही शिवीगाळ करत किशोर पळून गेला होता. याबाबत करमाड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने यापीर्वीही फिर्यादीचा विनयभंग केला होता.

खटल्याच्या सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी किशोर बैनाडे याला ‘विनयभंगाच्या’ आरोपाखाली भादंवि ३५४ (अ) नुसार वरीलप्रमाणे शिक्षा, दंड आणि नुकसानभरपाईचा आदेश दिला. सहायक सरकारी वकील आमेर काझी यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस.बी. पठाण यांनी काम पाहिले.