शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

१२३८ इमारतींचा ‘भोगवटा’ महापालिकेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील सुमारे १२५० इमारतींनी भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही. त्या इमारतींनी प्रमाणपत्र घेतले नाही तर कारवाई करण्याचा ...

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील सुमारे १२५० इमारतींनी भोगवटा प्रमाणपत्रच घेतलेले नाही. त्या इमारतींनी प्रमाणपत्र घेतले नाही तर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर भोगवटा प्रमाणपत्र घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक असताना अनेक जण टाळाटाळ करतात. मनपा नगररचना विभागाकडून टाळाटाळ करणाऱ्या इमारतधारकांवर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात बांधकाम व्यावसायिक, वैयक्तिक मालकीच्या बड्या १२३८ इमारत मालकांची यादी तयार केली आहे. कारवाईसाठी नगररचना विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मनपा हद्दीत परवानगीविना बांधकाम करता येत नाही. बांधकाम पूर्ण झाल्यावर नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. त्याशिवाय इमारतीचा वापर करणे हे बेकायदा असते. दरवर्षी साधारणत: दोन हजार बांधकाम परवानग्या दिल्या जातात, त्यातून मोजकेचे इमारतधारक भोगवटा प्रमाणपत्रासाठी येतात. यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून फ्लॅट, रो-हाऊस खरेदी करणारे हवालदिल असतात.

उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्या देखरेखीत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्यात १८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कक्षाने मागील सात वर्षांतील बांधकाम परवानग्यांच्या संचिकांची छाननी करून त्यातील भोगवटा न घेतलेल्यांची वेगळी यादी तयार केली आहे. सध्या बड्या बांधकामांवरच लक्ष केंद्रित केले आहे. नोटीस देण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. भोगवटा नसलेल्या इमारतीतील सदनिकाधारकांनी आवाज उठविल्यास त्यांना मदत करण्याची तयारी प्रशासन करण्याच्या तयारीत आहे.

नगरचना विभागाची माहिती अशी...

सहायक संचालक नगररचना जयंत खरवडकर यांनी सांगितले, नियमानुसार भोगवटा घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी भोगवटा न घेताच सदनिकांची विक्री केलेली आहे, अशा बांधकाम व्यावसायिकांनी तातडीने त्यांचे प्रस्ताव सादर केल्यास नियमित शुल्क भरून घेऊन कार्यवाही केली जाईल.