शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पोलिसांच्या कार्यक्षमतेसाठी नैमित्तिक रजा १२ वरून २० होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:03 IST

राम शिनगारे औरंगाबाद : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यांना २० ते २२ शासकीय, सार्वजनिक सुट्या मिळतात; ...

राम शिनगारे

औरंगाबाद : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे. त्यांना २० ते २२ शासकीय, सार्वजनिक सुट्या मिळतात; मात्र पोलिसांना बंदोबस्तामुळे या सुट्या मिळत नाहीत. त्यामुळे एका वर्षात असलेल्या नैमित्तिक रजा १२ वरून २० कराव्यात, यासाठीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांना मंगळवारी (दि.२४) दिला आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय पांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाविषयीचे निर्णय घेण्यात येत आहेत. राष्ट्रपती पोलीस पदकासाठीही लॉबिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पांडे यांनी केंद्रीय गृह विभागाकडे पाठविले होते. याशिवाय सध्या राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही अतिरिक्त लाँबिग आणि दबावाला बळी न पडता नियमानुसार बदल्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पांडे यांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या नैमित्तिक रजा वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे. त्यास अपर सचिवांची मान्यता मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १२ ऐवजी २० नैमित्तिक रजा मिळणार आहेत.

चौकट,

साडेआठ तासांपेक्षा अधिक काम

राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक साप्ताहिक सुटी मिळते. कामकाजाचा व्याप जास्त असल्यामुळे पोलीस निरीक्षक ते अंमलदार यांना प्रतिदिनी साडेआठ तासांपेक्षा अधिक काम करावे लागते. गणपती, नवरात्र, ईद बंदोबस्त, व्हीआयपी बंदोबस्त आणि इतर बंदोबस्ताच्या काळात तर नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ कर्तव्यावर हजर राहावे लागते. शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतानाच साडेआठ तास काम करावे लागते, याकडेही महासंचालक पांडे यांनी लक्ष वेधले आहे.

चौकट,

शारीरिक, मानसिक आरोग्य जपणे आवश्यक

सतत कामकाजाच्या व्यापामुळे पोलीस निरीक्षक ते पोलीस अंमलदार यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यांना कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आणि कुटुंबात अस्थिरता निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी अधिकारी, अंमलदारांच्या नैमित्तिक रजेत वाढ केली पाहिजे. यातून त्यांना मानसिक, शारीरिक आराम मिळून त्यांचे स्वास्थ्य चांगले राहील व त्यांना कुटुंबाला पुरेसा वेळ देता येऊन स्थैर्यता निर्माण होईल. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढून ते कर्तव्य चोख पार पाडू शकतील, असेही पांडे यांनी प्रस्तावात स्पष्ट केले आहे.