शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

बौद्ध धम्माची दिक्षा म्हणजेच ओबीसींची ‘घरवापसी’

By admin | Updated: March 19, 2015 23:56 IST

शिरीष शिंदे, बीड ‘आम्ही हिंदू असतानाही क्षुद्रांप्रमाणे वागणूक दिली जाते. ओबीसी हे नागवंशी असल्याने बौद्ध धम्म हा आमचा मूळ धर्म आहे. बौद्ध धम्माची दिक्षा घेणे

शिरीष शिंदे, बीड ‘आम्ही हिंदू असतानाही क्षुद्रांप्रमाणे वागणूक दिली जाते. ओबीसी हे नागवंशी असल्याने बौद्ध धम्म हा आमचा मूळ धर्म आहे. बौद्ध धम्माची दिक्षा घेणे ही ओबीसींची घरवापसी आहे’, असे परखड मत सत्य शोधक ओबीसी परिषदेचे राष्ट्राध्यक्ष हनुमंत उपरे यांचे होते. २०१६ पर्यंत पाच लाख हिंदू ओबीसींना धम्माच्या वाटेवर नेण्याच्या संकल्पाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही त्यांनी धक्का दिला होता. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळ पोरकी झाली आहे. ओबीसींचे सामाजिक प्रश्न जेथे कोठे निर्माण होत तेथे हनुमंत उपरे उर्फ काका यांचे नाव समोर यायचे. कारण त्यांनी ओबीसींसाठी आपले आयुष्य वेचले होते. त्यांच्या ओेबीसींसाठीच्या कार्याचा आलेख वाढतच गेला होता. धर्म हा एखाद्या घराप्रमाणे असतो तेथे सर्वांना समान व आदराची वागणूक दिली जाते. तेथे कोणाताही भेदभाव नसतो. ज्या हिंदू धर्माला विशिष्ठ नावे देऊन असभ्य वर्तणूक दिली जाते त्या घरात राहण्यात काहीच अर्थ नाही अशी आर्त हाक देत त्यांनी २०११ पासून ओबीसी धर्मांतराचा लढा उभा केला. आपली भूमिका त्यांनी सक्षमपणे ओबीसी बांधवासमोर मांडली. पाहता पाहता त्यांनी चार वर्षात अनेकांना धम्माच्या वाटेवर नेले. २०१६ पर्यंत पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दिक्षा देण्याचा संकल्पातून त्यांनी काम अखंडपणे सुरुच ठेवले होते. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जाती व्यवस्था नष्ट होईल असे ओबीसींना वाटले होते; मात्र तसे न होता उच्च वर्णीयांनी जातीव्यवस्था कायम ठेवल्याने ओबीसी गरीबच राहिले. कालबाह्य जातीव्यवस्था जिवंत ठेवल्यामुळे आजही ओबीसींचा विकास झाला नाही. त्यामुळे आपण बौद्ध धम्मात जाण्याचा सल्ला त्यांनी कायम दिला. वामन दहनासाठी नेहमीच पुढाकार दिवाळीमध्ये हमखास वामन दहन करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार होता. सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन ते शहरातील मुख्य भागातून स्वत: हातात गाडगं धरुन चालायचे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आणून त्याचे दहन करायचे. ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशा घोषणा देत मनुवादी विचारांचे दहनही व्हायचे. आता प्रत्येक दिवाळीला वामन दहनाच्या वेळी त्यांची आठवण राहिल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींसाठी खऱ्या अर्थाने झटणारा, बहुजनांचा चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. हे कटु वास्तव ओबीसींनी स्वीकारुन त्यांनी सांगितलेल्या वाटेवर जाणे हे सर्वांसाठी योग्यच ठरणार आहे. वर्णभेद व जातीच्या विभागणीस तिलांजली देऊन सर्वांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन त्या मार्गाचा अवलंब करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.