शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार बचत गटांकडे देण्यास ना

By admin | Updated: July 2, 2014 01:02 IST

फुलंब्री : शालेय पोषण आहारचे काम बचत गटाच्या ताब्यात देण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.

फुलंब्री : शालेय पोषण आहारचे काम बचत गटाच्या ताब्यात देण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापकांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. आर्थिक नुकसान होईल, असे यामागचे कारण असल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे.शालेय पोषण आहार योजनेची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी परिपत्रक जारी करून पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांना देण्याचे आदेश जारी करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ते बचत गटांना देण्यात येणार होते; पण तालुक्यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी आदेश पाळले नाहीत. त्यासाठी ते वेगवेगळी कारणे सांगत आहेत. गावातील बचत गटांत भांडणे लागतील, शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरेल, गावात राजकारण होईल, पाणीटंचाई आहे, सरपण मिळत नाही, बचत गट भाजीपाला टाकणार नाही, अशी कारणे ते दाखवीत आहेत.वास्तविक पाहता पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांना दिली, तर मुख्याध्यापक निवांत राहतील. एखादी चुकीची घटना घडल्यास मुख्याध्यापकाच्या नोकरीवर गदा येणार नाही, त्यांना सामोरे जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना शाळेच्या गुणवत्ता वाढीकडे अधिक लक्ष देता येईल. शासनाच्या आदेशाप्रमाणे शालेय पोषण आहार वाटपाची जबाबदारी बचत गटाकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण अद्याप मुख्याध्यापकांनी बचत गटाकडे जबाबदारी दिलेली नाही. या प्रकरणी आम्ही आदेश काढणार आहोत, असे शालेय पोषण आहार प्रभारी शिवाजीराव भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)एकाच मुख्याध्यापकाकडून पालनबहुतांश मुख्याध्यापक आर्थिक मोहापोटी शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटाकडे देण्यास तूर्त तरी तयार नाहीत. तालुक्यात धामणगाव जि.प. शाळेतील मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी मात्र पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटाकडे दिली आहे.