शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका, सेवकांकडून रुग्णसेवा

By admin | Updated: May 17, 2017 00:26 IST

येडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़

लोकमत न्यूज नेटवर्कयेडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचारिका व सेवकांनीच रुग्णांवर प्रथमोपचार केले़येडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ गावाचा समावेश आहे़ उपळा, कुमाळवाडी, आळणी ही उपकेंद्र आहेत़ तर जवळा उपकेंद्र सुरू होणार आहे़ कळंब तालुक्यातील ८ ते १० गावे येडशी जवळ असल्याने तेथील रुग्णही उपचारासाठी येडशी येथे येतात. राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अपघातग्रस्तांना प्रथमोपचारासाठी येथेच आणले जाते़ प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ पदे मंजूर असून, तीन पदे रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहेत़ डॉ़ झेड़ ए़ पटेल हे वैद्यकीय रजेवर आहेत़ सध्या ईटकूरचे डॉ़ वाघमोडे हे काम पहात आहेत़ आरोग्य सेविकाची २ पदे व आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर अंकूश नाही़ तर बायोमट्रीक मशीन बंद असून, ती सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ गत काही दिवसापूर्वी पंस सदस्य संजय लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला होता़ त्यावेळी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही़ अनेकवेळा कर्मचारी वीज बंद करून गेटला कुलूप लावून झोपी जातात़ त्यामुळे दवाखाना सुरू आहे की बंद ? हेच रात्रीच्यावेळी समजत नाही़या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची सोमवारी रात्री ७ ते ११़३० या वेळेत पाहणी केली असता रुग्णांच्या गैरसोयीचे प्रकार समोर आले़ डॉक्टर नसल्याने आरोग्य सेविका पी़ए़पारडे व शिपाई पाडूरंग ठोकळे यांनीच येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले़ येडशी येथील जनार्दन दत्तू नागटिळक हे वयोवृद्ध नागरिक अचानक चालता येत नाही म्हणून तर शिवाजी पांडुरंग गाढवे (रा वडगाव ताक़ळंब) हे पायाला जखम झाल्याने उपचारासाठी आले होते़ तर आकाश तानाजी पवार (लमाण तांडा), विनायक शकंर धोगडे (रा वाघोली) राणी अभिमन्यू जाधव (रा जवळा) यांना छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आणले होते़ महेश सूतार (रा़ शेलगाव ज.) व कमलेश निसार यांना गाडीवरून पडल्याने रात्री ११ वा उपचारासाठी आणण्यात आले होते़ या सर्वांवर कर्मचाऱ्यांनीच उपचार केले़ एखादा गंभीर आजाराचा किंवा अपघातासारखा प्रसंग ओढावला तर रात्री डॉक्टर नसतात़ त्यामुळे येथे कायम डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे़