शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

परिचारिका, सेवकांकडून रुग्णसेवा

By admin | Updated: May 17, 2017 00:26 IST

येडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़

लोकमत न्यूज नेटवर्कयेडशी : सोलापूर- औरंगाबाद या राष्ट्रीय तर बार्शी- लातूर या रज्य महामार्गावर वसलेल्या येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते़ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचारिका व सेवकांनीच रुग्णांवर प्रथमोपचार केले़येडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११ गावाचा समावेश आहे़ उपळा, कुमाळवाडी, आळणी ही उपकेंद्र आहेत़ तर जवळा उपकेंद्र सुरू होणार आहे़ कळंब तालुक्यातील ८ ते १० गावे येडशी जवळ असल्याने तेथील रुग्णही उपचारासाठी येडशी येथे येतात. राष्ट्रीय, राज्य मार्गावरील अपघातग्रस्तांना प्रथमोपचारासाठी येथेच आणले जाते़ प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ पदे मंजूर असून, तीन पदे रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहेत़ डॉ़ झेड़ ए़ पटेल हे वैद्यकीय रजेवर आहेत़ सध्या ईटकूरचे डॉ़ वाघमोडे हे काम पहात आहेत़ आरोग्य सेविकाची २ पदे व आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांवर अंकूश नाही़ तर बायोमट्रीक मशीन बंद असून, ती सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत आहे़ गत काही दिवसापूर्वी पंस सदस्य संजय लोखंडे यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला होता़ त्यावेळी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही़ अनेकवेळा कर्मचारी वीज बंद करून गेटला कुलूप लावून झोपी जातात़ त्यामुळे दवाखाना सुरू आहे की बंद ? हेच रात्रीच्यावेळी समजत नाही़या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची सोमवारी रात्री ७ ते ११़३० या वेळेत पाहणी केली असता रुग्णांच्या गैरसोयीचे प्रकार समोर आले़ डॉक्टर नसल्याने आरोग्य सेविका पी़ए़पारडे व शिपाई पाडूरंग ठोकळे यांनीच येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले़ येडशी येथील जनार्दन दत्तू नागटिळक हे वयोवृद्ध नागरिक अचानक चालता येत नाही म्हणून तर शिवाजी पांडुरंग गाढवे (रा वडगाव ताक़ळंब) हे पायाला जखम झाल्याने उपचारासाठी आले होते़ तर आकाश तानाजी पवार (लमाण तांडा), विनायक शकंर धोगडे (रा वाघोली) राणी अभिमन्यू जाधव (रा जवळा) यांना छातीत दुखत असल्याने उपचारासाठी आणले होते़ महेश सूतार (रा़ शेलगाव ज.) व कमलेश निसार यांना गाडीवरून पडल्याने रात्री ११ वा उपचारासाठी आणण्यात आले होते़ या सर्वांवर कर्मचाऱ्यांनीच उपचार केले़ एखादा गंभीर आजाराचा किंवा अपघातासारखा प्रसंग ओढावला तर रात्री डॉक्टर नसतात़ त्यामुळे येथे कायम डॉक्टरांची नियुक्ती करणे आवश्यक आहे़