शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

कोरोनाबळींमध्ये तरुणांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST

मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ६० ...

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ६० ते ८५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा होत होता. धक्कादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत २९ ते ५० वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकट्या औरंगाबाद शहरात तब्बल चौदा जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू सत्रामुळे आरोग्य यंत्रणाही पेचात पडली आहे.

१ मार्चनंतर कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी २०० ते २५० पॉझिटिव्ह रुग्ण, ५ ते ७ रुग्णांचा मृत्यू होत होता. ६ मार्चनंतर तर रुग्णसंख्या दहा पटीने वाढली. मृत्यू दररोज २५ ते ३० पर्यंत सुरू झाले. पॉझिटिव्ह आलेले ९० टक्के ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असायचे. त्यांच्यावर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत होती. ज्येष्ठांचे मृत्यू सत्र कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. आता त्यापेक्षाही आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पॉझिटिव्ह येत असलेल्या तरुणांना कोरोनारूपी राक्षस मृत्युच्या दाढेत ओढत आहे. ३ ते ८ एप्रिल या सहा दिवसांत अवघ्या औरंगाबाद शहरातील ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. २९ ते ५२ वयोगटांतील १६ जणांचा यात समावेश आहे. उपचाराला तरुणाई प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव आरोग्य यंत्रणेचा आहे.

मृत्युसत्र अतिशय गंभीर

घाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये काही दिवसांमध्ये अत्यंत कमी वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होतोय ही वस्तुस्थिती आहे. या मृत्यू मागची कारणे शोधण्याचे काम महापालिका आणि घाटी प्रशासन करीत आहे. तरुणाईचे मृत्युसत्र अतिशय गंभीर असून, काळजी घेणे हाच एकमेव उपाय सध्या आहे.

डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

असे आहे सहा दिवसांतील मृत्युसत्र

तारीख - वय - रुग्णाचा पत्ता

३ एप्रिल - ४४ - नित्यानंद पार्क, पडेगाव

४ - ५० पेक्षा खालील एकाही नागरिकाचा मृत्यू नाही.

५ - ३८ - जुना बाजार

५- ४० - एकतानगर

५- ४४ - चिकलठाणा

५- ४४ - हडको एन- ११

६ - ३१ - राजीव गांधीनगर

६ - ३९ - हरसूल

६- ५६ - भोईवाडा

६- ५२ - चिकलठाणा

७- २९- आसेफिया कॉलनी

७ ४० - नारेगाव

७ २५- एसटी कालनी, फाजलपुरा

७ ४१ - उस्मानपुरा

८ - ३५ - सातारा

८ ४५ - सिडको