शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मराठवाड्यात टँकर्सची संख्या पुन्हा वाढू लागली!

By admin | Updated: August 30, 2016 01:19 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा टँकर्सची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकर्सची अधिक गरज भासू लागली आहे. बीड जिल्ह्यात पाच गावे आणि ३० वाड्यांमध्ये आजघडीला २९ टँकर्स चालू आहेत, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० गावांमध्ये ३० टँकर्स चालू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात टँकरसाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २० तर बीड जिल्ह्यात टँकर्ससाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी विहिरींची संख्या २ आहे. मागील आठवड्यात या दोन जिल्ह्यांत मिळून ३६ टँकर्स चालू होते. २६ आॅगस्ट अखेरच्या अहवालानुसार ही संख्या वाढून ५९ झाली आहे. २३ टँकर्स वाढले आहेत. जायकवाडी धरण ६६ टक्के भरले. वरच्या धरणांमधला पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे आणि बाष्पीभवनामुळे व पिण्यासाठी पाणी वापरावे लागत असल्यामुळे आता जायकवाडीतला साठा एक टक्का घटला आहे. मोठा पाऊस झाल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा उन्हाळ्यात पुन्हा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल व टँकर्सची संख्या वाढेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.