शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात विभागातील टँकरची संख्या ३२ वरून वाढून ६२ झाली आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २८ टँकर सुरू आहेत. अत्यल्प पावसामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प रिकामेच आहेत. शिवाय, भूजल पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे आॅगस्टपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादसह जालना नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात विभागात ३८ गावांना ३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, चालू आठवड्यात आणखी २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. त्यामुळे टँकरची संख्या ३० ने वाढली आहे. सध्या विभागात ६० गावांना ६२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पैठण तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत. विहीर अधिग्रहणाचा वेगही वाढलाटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरबरोबरच विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. प्रशासनातर्फे विभागातील हिंगोली वळता सातही जिल्ह्यांत विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विहीर अधिग्रहणाचा वेग वाढला आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ७९ विहिरींचे अधिग्रहण झालेले होते. चालू आठवड्यात ही संख्या १२४ वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.