शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात विभागातील टँकरची संख्या ३२ वरून वाढून ६२ झाली आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २८ टँकर सुरू आहेत. अत्यल्प पावसामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प रिकामेच आहेत. शिवाय, भूजल पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे आॅगस्टपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादसह जालना नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात विभागात ३८ गावांना ३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, चालू आठवड्यात आणखी २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. त्यामुळे टँकरची संख्या ३० ने वाढली आहे. सध्या विभागात ६० गावांना ६२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पैठण तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत. विहीर अधिग्रहणाचा वेगही वाढलाटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरबरोबरच विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. प्रशासनातर्फे विभागातील हिंगोली वळता सातही जिल्ह्यांत विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विहीर अधिग्रहणाचा वेग वाढला आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ७९ विहिरींचे अधिग्रहण झालेले होते. चालू आठवड्यात ही संख्या १२४ वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.