शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

टँकरची संख्या पन्नास टक्क्यांनी घटली !

By admin | Updated: July 23, 2016 00:53 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३७.७ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीमध्ये थोड्याबहुत प्रमाणात वाढ होवू लागल्यान

उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३७.७ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीमध्ये थोड्याबहुत प्रमाणात वाढ होवू लागल्यान टंचाई निवारणार्थ राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची संख्याही कमी होवू लागली आहे. १० जूनपर्यंत जिल्हाभरातील टंचाईग्रस्त गावांना तब्बल ४२२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. टँकरची ही संख्या आता २०९ पर्यंत खाली आली आहे. अधिग्रहणांची संख्याही रोडावू लागली आहे.जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवत आाहे. यंदा सरासरीपेही अधिक पाऊस पडेल, असे भाकित हवामान खात्याने केले होते. परंतु, भाकिताप्रमाणे सध्या चित्र नाही. जून महिना सरत आला असतानाही जिल्ह्याचा काही भाग वगळता अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा होतो आहे. ज्या भागात दमदार पाऊस झालेला आहे, अशा अशा गावांतील टंचाईच्या उपाययोजना हाती कमी होवू लागल्या आहेत. १० जूनअखेर जिल्हाभरातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे ४२२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या तब्बल पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे. आजघडीला जिल्हाभरा मिळून २०९ टँकर सुरू आहेत. दरम्यान, असेच चित्र अधिग्रहणांच्या बाबतीतही पहावयास मिळते. १० जूनअखेर १ हजार ४६६ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविली जात होती. सध्या अधिग्रहणांची संख्याही १ हजार १०४ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात दमदार पाऊस झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्हाभरात मिळून ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ४३ टक्के हा तुळजापूर तालुक्यात पर्जन्यमान झाले. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यात २२.४ टक्के, उमरगा ३७.६ टक्के, लोहारा ३०.५ टक्के, कळंब १९.२ टक्के, भूम २७ टक्के आणि वाशी तालुक्यात ३०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. झालेल्या पावसाची टक्केवारी पहाता अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकाही तालुक्याने पन्नासी ओलांडलेली नाही. असे असतानाही टँकरची संख्या एवढ्या झपाट्याने कमी कशी होवू लागली? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.