शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

टँकरची संख्या ४०० वर

By admin | Updated: May 4, 2016 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याची टंचाईही वाढू लागली आहे़ वाढत्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी तब्बल ३७९ टँकरना मंजुरी दिली आहे़ तर ३४७ गावे आणि टँकरसाठी २४७ अशी एकूण १३२६ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, शहरी भागातील नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे़ टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायत स्तरावरून येणाऱ्या प्रस्तावांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात येत आहे़ सध्या जिल्ह्यातील २४६ गावे आणि १४ वाड्यांसाठी ३७९ टँकरना मंजुरी देण्यात आली आहे़ यात उस्मानाबाद तालुक्यातील ४० गावांसाठी ७८ टँकर, तुळजापूर तालुक्यातील २३ गावांसाठी ३५ टँकर, उमरगा तालुक्यातील ३० गावांसाठी ५४ टँकर, लोहारा तालुक्यातील ७ गावांसाठी २० टँकर, कळंब तालुक्यातील ४० गावांसाठी ५३ टँकर, भूम तालुक्यातील ५३ गावांसाठी ५८ टँकर, वाशी तालुक्यातील २५ गावांसाठी ३१ टँकर तर परंडा तालुक्यातील २८ गावांसाठी ३० टँकर सुरू करण्यात आले आहेत़यात उस्मानाबाद तालुक्यातील विठ्ठलवाडी, बुकनवाडी, कनगरा, तोरंबा, मुळेवाडी, सकणेवाडी, कोलेगाव, कौडगाव बावी, रूईढोकी, जवळे दुमाला, रूईभर, उंबरेगव्हाण, नांदुर्गा, बोरखेडा, इर्ला, आंबेवाडी, दूधगाव, खामगाव, गडदेवधरी, डकवाडी, कोळेवाडी, कामेगाव, वाणेवाडी, बामणीवाडी येथे प्रत्येकी एक, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, मेंंढा, काजळा, टाकळी बेंबळी, वडगाव सिध्देश्वर येथे प्रत्येकी दोन, करजखेडा, तेर, सांजा येथे प्रत्येकी तीन, पळसप येथे चार, येडशी, कसबेतडवळे, बेंबळी येथे प्रत्येकी सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़ तुळजापूर तालुक्यातील अणदूर- पुजारी तांडा, ढेकरी, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला खुर्द, खानापूर, चिवरी, वडगाव काटी, आरळी खुर्द, आलियाबाद, सांगवी मा़ वडगाव ला़ येथे प्रत्येकी एक, कसई, खुदावाडी तांडा, होर्टी, जळकोट, किलज येथे प्रत्येकी दोन, सलगरा दिवटी, आपसिंगा येथे प्रत्येकी तीन तर मंगरूळ येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़उमरगा तालुक्यातील मातोळा, नारंगवाडी प़ कोळसूर के़ बाभळसूर, हिप्परगावाडी, काळनिंबाळा, कोरेगाव, मळगी, भिकार सांगवी, कोरेगाववाडी, जकेकूरवाडी, कोळसूर (गु़), गणेशनगर, नाईकनगर (एक), नाईकनगर (सु़), त्रिकोळी, सावळसूर आदी गावात प्रत्येकी एक, चिंचोली ज, नारंगवाडी पू़ कडदोरा, कवठा, कसगी, आनंदनगर, माडज, कलदेव निंबाळा, डिग्गी येथे प्रत्येकी दोन, औराद, बेळंब, येणेगूर, पेठसांगवी, बलसूर येथे प्रत्येकी तीन टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ या शिवाय लोहारा, कळंब, भूम, वाशी व परंडा तालुक्यातील गावा-गावांनाही टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़ (प्रतिनिधी) टँकरसाठी ३३८ अधिग्रहणेजिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ हे टँकर भरण्यासाठी ३३८ विहिरी, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ याशिवाय ३४७ गावांसाठी ९८८ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ या कूपनलिकांवरून गावा-गावांतील ग्रामस्थ पाणी भरत आहेत़ टँकर भरण्यासाठी आणि गावा-गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल १३२६ विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़१३७ खेपा कमीजिल्ह्यातील २४६ गावांसाठी ३७९ टँकर सुरू आहेत़ या टँकरच्या ७७४० खेपा मंजूर आहेत़ मात्र, एप्रिल अखेरच्या अहवालानुसार मंजूर ७७४० खेपांपैकी केवळ ६००५ खेपा झाल्या असून, यात १७३५ खेपा या कमी झाल्याची नोंद आहे़ केवळ खंडित वीजपुरवठा आणि दूरवरील अधीग्रहण यामुळे या टँकरच्या खेपा कमी होताना दिसत आहेत़