शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर...

By admin | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे.

औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी होत असताना प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही प्रयत्न करण्यात येत नाहीत, हे विशेष. मनपा शाळांमधील विद्यार्थी खाजगी संस्थाचालक अक्षरश: पळवून नेतात, तरी प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही.मनपाच्या शहरात ७० शाळा असून, त्यात मराठी माध्यमाच्या ४५, उर्दू माध्यमाच्या १८ तर द्विभाषीय ७ शाळांचा समावेश आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील असतात. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थीही चांगले दिसावेत म्हणून मोफत गणवेश, इस्कॉनची साजूक तुपाची खिचडी देण्यात येते. गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. दरवर्षी जून महिन्यात खाजगी संस्थाचालक मनपा शाळांचे विद्यार्थी पळवून नेतात. विद्यार्थी पळवून नेणाऱ्या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेशही आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. २००७-०८ मध्ये मनपाच्या ७२ शाळांमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. गतवर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१५ मध्ये १४ हजार ७५४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यंदा विद्यार्थी संख्या १३ हजार ६५७ एवढी झाली आहे. बालवाडीत ३ हजार ३४१ एवढे विद्यार्थी असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. मनपात शिक्षकांची ५०८ पदे मंजूर असून, ४६७ शिक्षक कार्यरत आहेत. तासिका तत्त्वावर ४६ व १५० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. दहा इमारती भाडेतत्त्वावरशहरात मागील ३० ते ३५ वर्षांपासून मनपा नागरिकांना शैक्षणिक सेवा देत आहे. मनपाच्या मालकीच्या ६० इमारती आहेत. आजही दहा शाळा भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. लाखो रुपये भाडे दरमहा मनपा प्रशासन देत आहे. आजपर्यंत मनपा जेवढे पैसे भाडे खर्चात टाकते, त्यामध्ये १० नवीन इमारती तयार झाल्या असत्या. या उधळपट्टीला प्रशासनही लगाम लावण्यास तयार नाही. दरवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये मनपाला प्राप्त होतात. हा निधी जातो तरी कोठे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.