शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्यावर...

By admin | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे.

औरंगाबाद : दरवर्षी महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मागील पाच ते सात वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या पन्नास टक्के झाली आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी होत असताना प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही प्रयत्न करण्यात येत नाहीत, हे विशेष. मनपा शाळांमधील विद्यार्थी खाजगी संस्थाचालक अक्षरश: पळवून नेतात, तरी प्रशासन कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही.मनपाच्या शहरात ७० शाळा असून, त्यात मराठी माध्यमाच्या ४५, उर्दू माध्यमाच्या १८ तर द्विभाषीय ७ शाळांचा समावेश आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील असतात. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपा शाळेतील विद्यार्थीही चांगले दिसावेत म्हणून मोफत गणवेश, इस्कॉनची साजूक तुपाची खिचडी देण्यात येते. गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. दरवर्षी जून महिन्यात खाजगी संस्थाचालक मनपा शाळांचे विद्यार्थी पळवून नेतात. विद्यार्थी पळवून नेणाऱ्या संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे आदेशही आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. २००७-०८ मध्ये मनपाच्या ७२ शाळांमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. गतवर्षी म्हणजेच सप्टेंबर २०१५ मध्ये १४ हजार ७५४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यंदा विद्यार्थी संख्या १३ हजार ६५७ एवढी झाली आहे. बालवाडीत ३ हजार ३४१ एवढे विद्यार्थी असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येत आहे. मनपात शिक्षकांची ५०८ पदे मंजूर असून, ४६७ शिक्षक कार्यरत आहेत. तासिका तत्त्वावर ४६ व १५० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. दहा इमारती भाडेतत्त्वावरशहरात मागील ३० ते ३५ वर्षांपासून मनपा नागरिकांना शैक्षणिक सेवा देत आहे. मनपाच्या मालकीच्या ६० इमारती आहेत. आजही दहा शाळा भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. लाखो रुपये भाडे दरमहा मनपा प्रशासन देत आहे. आजपर्यंत मनपा जेवढे पैसे भाडे खर्चात टाकते, त्यामध्ये १० नवीन इमारती तयार झाल्या असत्या. या उधळपट्टीला प्रशासनही लगाम लावण्यास तयार नाही. दरवर्षी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये मनपाला प्राप्त होतात. हा निधी जातो तरी कोठे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.