शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीचा आकडा १२५५ कोटींवर

By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीची योजना २०० कोटी रुपयांऐवजी ४६२ कोटी ८० लाख रुपयांनी महागली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीची योजना २०० कोटी रुपयांऐवजी ४६२ कोटी ८० लाख रुपयांनी महागली आहे. ही रक्कम देणार कोण, योजनेला विलंब कुणामुळे झाला. या सगळ्यांवर तोडगा काय, यासाठी उद्या २४ जुलै रोजी मनपा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या प्रतिनिधीत बैठक होत आहे. २०३१ पर्यंतच्या लोकसंख्येला पाणी मिळावे. यासाठी ही योजना पुढे आली. मार्च २०११ मध्ये मनपाने ७९२ कोटींची निविदा मंजूर केली. योजनेचे भागीदार संजय काकडे यांनी कंपनीविरुद्ध दावा केला. दावा क्र.५/२०१३ मध्ये काकडे इन्फ्रा प्रा.लि., एम.पी.एम.एल.इं.लि., एस.पी.एम.एल युटिलिटी लि. वॅबग लि., औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि., औ.बाद. जलसप्लाय सोल्यूशन प्रा.लि. आणि छत्रपती इन्फ्रा.प्रा.लि., यांच्या विरोधात करण्यात आल्या. दाव्यात योजनेची किंमत १ हजार २५५ कोटी नमूद केली होती. त्यामुळे समांतर जलवाहिनी २०० ऐवजी ४६२ कोटी ८० लाख रुपयांनी महागली आहे. २०० कोटींची योजना महागणार म्हटले तरी ९९२ कोटींवर योजना जाते. काकडे यांनी दाव्यातील पान क्र.७० च्या अ.क्र.१४ मध्ये म्हटले होते की, बँकेकडे १२५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव एसपीएमएल आणि एसीडब्ल्यूयूसीएल दाखल केला आहे. ३०० एमएलडीचा करार४४० एमएलडी पाण्याची प्रतिदिन आवश्यकता असेल. योजनेच्या करारात ३०० एमएलडी पाणीपुरवठ्याचा करार आहे. उर्वरित १४० एमएलडी पाणी कुठून देणार हा प्रश्न आहे. दरम्यान, समांतर जलवाहिनी प्रकरणात न्यायालयीन लढा देणारे राजेंद्र दाते म्हणाले, मनपा आणि ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जनहित याचिकाप्रकरणी न्यायालयाने राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. अर्जदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे. याप्रकरणी अजून सुनावणीच झालेली नाही. असे असताना पालिका पातळीवर घाई सुरू आहे. वाढीव रकमेच्या पर्यायानंतर हस्तांतरण ४योजनेच्या कामाला उशीर का झाला? असा कंपनीचा प्रश्न आहे. २० जुलैनंतर मनपा व एसीडब्ल्यूयूसीएलच्या प्रतिनिधीत बैठका झाल्या. योजनेचे काम हस्तांतरण करण्यासाठी २ महिने लागतील. योजना २०० कोटींनी महागली आहे की, त्यापेक्षा जास्तीने हे तपासले जाईल. कर्ज काढण्याची व नागरिकांवर बोजा टाकण्याची मनपाची तयारी नाही. वाढीव रकमेचा पर्याय निघेपर्यंत एसीडब्ल्यूयूसीएलकडे काम हस्तांतरित होणार नाही.आजवर काय झाले...२३ जुलैपर्यंत समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसोबत बैठका झाल्या. शासनाकडे कोणतीही परवानगी शिल्लक नाही.आता शासनाने समांतरच्या बाबतीत वाढीव रक्कम मिळणार नाही, असे मनपाला सांगितले आहे. वाढीव रक्कम जनतेवर लादता येणे शक्य नाही. योजनेच्या विलंबाला पालिका जबाबदार नाही, असे आजपर्यंत मनपाने स्पष्ट केले आहे.