शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

हज यात्रेकरूंची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:22 IST

यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील १४ वर्षांपासून शहरातील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून दरवर्षी तीन हजारांहून अधिक हज यात्रेकरू थेट जेद्दाह येथे रवाना होत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. औरंगाबादहून हज यात्रेला जायचे असल्यास एका यात्रेकरूला ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. केंद्राच्या या नवीन नीतीमुळे यात्रेकरूंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.हज यात्रा-२०१८ मध्ये मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील यात्रेकरूंची संख्या जवळपास तीन हजारांहून अधिक आहे. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंची सबसिडी बंद केली असली तरी हज यात्रेकरूंच्या संख्येत किंचितही फरक पडलेला नाही. सबसिडी प्रत्येक हज यात्रेकरूंसाठी गौण होती. मात्र, सोयी-सुविधा चांगल्या मिळाव्यात एवढीच रास्त अपेक्षा यात्रेकरूंकडून आहे. मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी हज यात्रेला जायचे म्हटले तर मुंबई गाठावी लागत होती. दोन यात्रेकरूंसोबत किमान १५ जण मुंबईला जात असत. तेथे राहाणे, ये-जा याचा खर्च २५ ते ३० हजार रुपये सहजपणे येत होता. यात्रेकरूंची ही मोठी अडचण लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी २००५ मध्ये थेट औरंगाबादहून जेद्दाह अशी विमानसेवा सुरू केली. या सेवेचा लाभ तब्बल १४ वर्षे यात्रेकरू घेत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेसाठी प्रचंड नियमात फेरबदल केले. औरंगाबाद विमानतळावरून थेट जेद्दाह येथे जायचे असल्यास ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे असंख्य यात्रेकरूंनी मुंबईहून जाणे पसंत केले. औरंगाबाद विमानतळावरून फक्त ५४० यात्रेकरू जाणार आहेत. २९ जुलैपासून यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना होणार आहे. तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दररोज २०० यात्रेकरू रवाना होतील.

टॅग्स :AirportविमानतळHaj yatraहज यात्रा