शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

हज यात्रेकरूंची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:22 IST

यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील १४ वर्षांपासून शहरातील चिकलठाणा आंतरराष्टÑीय विमानतळावरून दरवर्षी तीन हजारांहून अधिक हज यात्रेकरू थेट जेद्दाह येथे रवाना होत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंच्या नियमावलीत बदल केल्याने औरंगाबाद विमानतळावरून तीन दिवसांमध्ये फक्त ५४० भाविक रवाना होणार आहेत. उर्वरित तब्बल अडीच हजार यात्रेकरूंना मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे. औरंगाबादहून हज यात्रेला जायचे असल्यास एका यात्रेकरूला ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. केंद्राच्या या नवीन नीतीमुळे यात्रेकरूंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.हज यात्रा-२०१८ मध्ये मराठवाडा आणि आसपासच्या जिल्ह्यांतील यात्रेकरूंची संख्या जवळपास तीन हजारांहून अधिक आहे. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेकरूंची सबसिडी बंद केली असली तरी हज यात्रेकरूंच्या संख्येत किंचितही फरक पडलेला नाही. सबसिडी प्रत्येक हज यात्रेकरूंसाठी गौण होती. मात्र, सोयी-सुविधा चांगल्या मिळाव्यात एवढीच रास्त अपेक्षा यात्रेकरूंकडून आहे. मराठवाड्यातील यात्रेकरूंना पूर्वी हज यात्रेला जायचे म्हटले तर मुंबई गाठावी लागत होती. दोन यात्रेकरूंसोबत किमान १५ जण मुंबईला जात असत. तेथे राहाणे, ये-जा याचा खर्च २५ ते ३० हजार रुपये सहजपणे येत होता. यात्रेकरूंची ही मोठी अडचण लक्षात घेऊन तत्कालीन मंत्री राजेंद्र दर्डा यांनी २००५ मध्ये थेट औरंगाबादहून जेद्दाह अशी विमानसेवा सुरू केली. या सेवेचा लाभ तब्बल १४ वर्षे यात्रेकरू घेत होते. यंदा केंद्र शासनाने हज यात्रेसाठी प्रचंड नियमात फेरबदल केले. औरंगाबाद विमानतळावरून थेट जेद्दाह येथे जायचे असल्यास ३० ते ३५ हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत होते. त्यामुळे असंख्य यात्रेकरूंनी मुंबईहून जाणे पसंत केले. औरंगाबाद विमानतळावरून फक्त ५४० यात्रेकरू जाणार आहेत. २९ जुलैपासून यात्रेकरूंचा पहिला जथा रवाना होणार आहे. तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दररोज २०० यात्रेकरू रवाना होतील.

टॅग्स :AirportविमानतळHaj yatraहज यात्रा