शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

जिल्ह्यातील चार तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत स्थिती गंभीर, मृत्यूदर नियंत्रित ठेवण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान औरंगाबाद : जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, ...

औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत स्थिती गंभीर,

मृत्यूदर नियंत्रित ठेवण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

औरंगाबाद : जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत सध्या रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत असून, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सोमवारी सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना, लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गव्हाणे यांनी आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना निर्देशित केले.

यावेळी जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. ज्योती बजाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. नांदापूरकर आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसात वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपचार सुविधा पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवाव्यात. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगत चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे गव्हाणे म्हणाले.

सीईओ गोंदावले यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवित असताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधिताला घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचविले. जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखणे आणि मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यादृष्टीने सर्वांनी पूर्वानुभवासह आणि समन्वयपूर्वक ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डीसीएच यासह सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, औषधोपचार साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे सूचित करून गव्हाणे यांनी, यावेळी संसर्ग हा पूर्वीपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. जनजागृती व मास्क वापर न करणाऱ्यांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी. परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक काम करण्याच्या सूचना प्र. जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी दिल्या.