शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जिल्ह्यातील चार तालुक्यांत कोरोना रुग्णसंख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत स्थिती गंभीर, मृत्यूदर नियंत्रित ठेवण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान औरंगाबाद : जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, ...

औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत स्थिती गंभीर,

मृत्यूदर नियंत्रित ठेवण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

औरंगाबाद : जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांत सध्या रुग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत असून, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे, असे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सोमवारी सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना, लसीकरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गव्हाणे यांनी आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणांना निर्देशित केले.

यावेळी जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. नेमाने, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. ज्योती बजाज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. शेळके, लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. नांदापूरकर आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या काही दिवसात वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व उपचार सुविधा पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवाव्यात. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी अधिक खबरदारी बाळगत चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे गव्हाणे म्हणाले.

सीईओ गोंदावले यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवित असताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधिताला घरातच विलगीकरणात राहणे बंधनकारक असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे सुचविले. जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखणे आणि मृत्यू दर नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यादृष्टीने सर्वांनी पूर्वानुभवासह आणि समन्वयपूर्वक ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, डीसीएच यासह सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, औषधोपचार साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे सूचित करून गव्हाणे यांनी, यावेळी संसर्ग हा पूर्वीपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. जनजागृती व मास्क वापर न करणाऱ्यांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई करावी. परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आणि सर्व यंत्रणांनी समन्वयपूर्वक काम करण्याच्या सूचना प्र. जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी दिल्या.