शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

डुलकी लागलेल्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST

औरंगाबाद : मनमाड-काचीगुडा रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा पाय रेल्वेखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लासूर स्टेशनजवळ घडली

औरंगाबाद : मनमाड-काचीगुडा रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा पाय रेल्वेखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लासूर स्टेशनजवळ घडली. यावेळी सदर प्रवासी दरवाजाजवळ बसलेला असल्याने डुलकी लागल्याने त्याचा तोल गेला आणि रेल्वेतून पडल्याने तो गाडीखाली आला होता. या व्यक्तीला घाटीत दाखल करण्यासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनमाड-काचीगुडा रेल्वे सकाळी ७.५७ मिनिटांनी लासूर स्टेशन येथे दोन मिनिटाच्या थांब्यानंतर निघाल्यावर यावेळी थोड्याच अंतरावर असणाऱ्या रेल्वे फाटकादरम्यान या रेल्वेतील एक प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत या प्रवाशाचा डावा पाय घोट्यापासून तुटल्याने तो प्रवासी बेशुद्ध झाला. प्रवाशांनी रेल्वे थांबविल्यानंतर रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या प्रवाशाला घाटीमध्ये नेण्यात आले. परंतु घाटीच्या डॉक्टरांनी सदर व्यक्तीची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार सोनवणे आणि मिलिंद वाघमारे करीत आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संतोषकुमार सोमाणी यांनी केला आहे.