शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डुलकी लागलेल्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST

औरंगाबाद : मनमाड-काचीगुडा रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा पाय रेल्वेखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लासूर स्टेशनजवळ घडली

औरंगाबाद : मनमाड-काचीगुडा रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा पाय रेल्वेखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लासूर स्टेशनजवळ घडली. यावेळी सदर प्रवासी दरवाजाजवळ बसलेला असल्याने डुलकी लागल्याने त्याचा तोल गेला आणि रेल्वेतून पडल्याने तो गाडीखाली आला होता. या व्यक्तीला घाटीत दाखल करण्यासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनमाड-काचीगुडा रेल्वे सकाळी ७.५७ मिनिटांनी लासूर स्टेशन येथे दोन मिनिटाच्या थांब्यानंतर निघाल्यावर यावेळी थोड्याच अंतरावर असणाऱ्या रेल्वे फाटकादरम्यान या रेल्वेतील एक प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत या प्रवाशाचा डावा पाय घोट्यापासून तुटल्याने तो प्रवासी बेशुद्ध झाला. प्रवाशांनी रेल्वे थांबविल्यानंतर रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या प्रवाशाला घाटीमध्ये नेण्यात आले. परंतु घाटीच्या डॉक्टरांनी सदर व्यक्तीची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार सोनवणे आणि मिलिंद वाघमारे करीत आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संतोषकुमार सोमाणी यांनी केला आहे.