शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...आता कुलसचिव शोधावे लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते. यामुळे परीक्षा संचालकाप्रमाणे कुलगुरूंना प्रभारी कुलसचिवपदासाठी व्यक्ती शोधावी लागणार आहे.विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूंनी प्रचलित नियमांनुसार कुलसचिवांची नेमणूक न करता डॉ. प्रदीप जब्दे यांना विद्यापीठ फंडातून वेतन दिले आहे. या दिलेल्या वेतनाविषयी राज्य सरकारने कडक शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. याचवेळी डॉ. जब्दे यांची म.शि.प्र. मंडळाच्या गंगापूर येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर सहा महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती केली होती. ही मुदत १४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, शनिवार, रविवारी सुट्या आल्यामुळे कुलसचिवांनी शुक्रवारीच मंडळात रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या निवडणूक विभागात काम करणाºया कर्मचा-यांना डॉ. जब्दे यांनी तशा पद्धतीच्या सूचनाही दिल्याचे समजते. पेंडिंग असलेली कामे पूर्ण करून घ्या, शुक्रवारी मी असेनच असे नाही. या शब्दांत सर्व कामे उरकून घेण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयी मंडळात चौकशी केली असता, डॉ. जब्दे हे रुजू होणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. मात्र, ते शुक्रवारी रुजू होणार, की सोमवारी याविषयी मतभिन्नता असल्याचे समजते. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आतच मूळ पदावर रुजू होण्यास डॉ. जब्दे यांनी प्राधान्य दिले आहे.प्रतिनियुक्ती देण्यापूर्वी सेवासातत्य खंडित झाले आहे. याविषयीचे ताशेरे सरकारने ओढले असल्यामुळे पुन्हा तीच चूक होऊ नये, याची खबरदारी डॉ. जब्दे घेत असल्याचे समजते.