शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

आता वॉर्डनिहाय जाहीरनामाही लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:43 IST

महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेड महापालिकेत महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई भवरे व उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाल्यानंतर खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोन्ही पदाधिकाºयांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शहरातील विकासकामासंदर्भात खा. चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातीलच. इतकेच नव्हे, तर मी स्वत: एखाद्या प्रभागास भेट देवून तेथील समस्यांची माहिती घेणार आहे.त्यानंतर याच पद्धतीने संपूर्ण वॉर्डा-वॉर्डातील समस्या जाणून घेतल्या जातील. त्या सोडवण्यासाठी वॉर्डनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करुन प्रश्न सोडविण्याचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. शहराचा पाच वर्षांचा विकास आराखडाही तयार केला जाईल. यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसने जनतेपुढे ठेवलेला जाहीरनामाही प्रशासनाकडे दिला आहे. ती कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कचरा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्याची गरज आहे.आजघडीला तांत्रिक अडचणीमुळे हा विषय प्रलंबित असला तरी तो लवकरच सोडविला जाईल. महापालिकेची परिस्थिती बिकट असली तरीही तिजोरीत खडखडाट नाही. फक्त आर्थिक नियोजनाची गरज असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहर हद्दवाढीच्या विषयात नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. मात्र शाश्वत विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. यासाठी त्या त्या भागातील नागरिकांचे तसेच माध्यमांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीतून मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावरही काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.