शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

आता वॉर्डनिहाय जाहीरनामाही लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:43 IST

महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाईल, असे प्रतिपादन खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.नांदेड महापालिकेत महापौरपदी काँग्रेसच्या शीलाताई भवरे व उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाल्यानंतर खा. चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोन्ही पदाधिकाºयांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शहरातील विकासकामासंदर्भात खा. चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शहरातील प्रमुख समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातीलच. इतकेच नव्हे, तर मी स्वत: एखाद्या प्रभागास भेट देवून तेथील समस्यांची माहिती घेणार आहे.त्यानंतर याच पद्धतीने संपूर्ण वॉर्डा-वॉर्डातील समस्या जाणून घेतल्या जातील. त्या सोडवण्यासाठी वॉर्डनिहाय जाहीरनामा प्रसिद्ध करुन प्रश्न सोडविण्याचा प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. शहराचा पाच वर्षांचा विकास आराखडाही तयार केला जाईल. यासंदर्भात महापालिका प्रशासनाशी प्राथमिक चर्चा झाली आहे. काँग्रेसने जनतेपुढे ठेवलेला जाहीरनामाही प्रशासनाकडे दिला आहे. ती कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील कचरा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्याची गरज आहे.आजघडीला तांत्रिक अडचणीमुळे हा विषय प्रलंबित असला तरी तो लवकरच सोडविला जाईल. महापालिकेची परिस्थिती बिकट असली तरीही तिजोरीत खडखडाट नाही. फक्त आर्थिक नियोजनाची गरज असल्याचे खा. चव्हाण म्हणाले. महापालिकेचे आर्थिक स्त्रोत बळकट करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहर हद्दवाढीच्या विषयात नागरिकांचा रोष पत्करावा लागतो. मात्र शाश्वत विकासासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. यासाठी त्या त्या भागातील नागरिकांचे तसेच माध्यमांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हद्दवाढीतून मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावरही काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.