शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

आता वर्कआॅर्डरची प्रतीक्षा!

By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशातून येणारे पाणी शुद्धीकरण करणारे एक युनिट गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशातून येणारे पाणी शुद्धीकरण करणारे एक युनिट गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले. त्यानंतर नगर पालिका व जिल्हा प्रशासनाने या बंद युनिटच्या दुरूस्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या युनिटच्या दुरूस्तीसाठी पालिका प्रशासनाने २९ लाखांच्या कामाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.जालना शहराला घाणेवाडी जलाशय आणि जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी विशेषत: नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा केला जात आहे. घाणेवाडी जलाशयातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येते. तेथे शुद्धीकरण झाल्यानंतर पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी दोन जलशुद्धीकरण करण्याचे युनिट आहेत. त्यापैकी एक युनिट तब्बल पाच वर्षापासून बंद आहे. एकाच युनिटवरून जलशुद्धीकरण होत असल्यामुळे नवीन जालना भागात पिवळसर पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. या संबंधी लोकमतने २७ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर नगरपालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घेतली. पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. नादुरूस्त असलेले युनिट सुरू करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक तयार केले. सुमारे ४५ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यात जलशुध्दीकरणाच्या बंद युनिटसाठी २९ लाख रूपये तर घाणेवाडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत असलेल्या जलवाहिनी दुरूस्तीसाठी दहा लाख रूपये असा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली असून लवकरच जलशुध्दीकरण केंद्राची दुरूस्ती करण्यासाठी वर्कआॅर्डर काढणे, एजन्सी नियुक्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)अनेक भागांत अशुद्ध पाणीपुरवठाजलशुद्धीकरण केंद्रातून नवीन जालना भागाला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जलशुद्धीकरण केंद्रातील बंद युनिटचे काम होणे गरजेचे आहे. आता त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने हे काम लकवरच होईल. त्यामुळे नागरिकांची पिवळसर पाण्यापासून सुटका मिळेल, अशी आशा जालनेकर बाळगून आहेत.जलशुध्दीकरण केंद्राच्या एक बंद युनिटच्या कामासाठी २९ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या कामाचे आता वर्कआॅर्डर बाकी आहे. वर्कआॅर्डर मिळताच संबंधित एजन्सीमार्फत हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.