शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

आता फुकटात टँकरचे पाणी बंद

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत.

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहींबाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत. शिवाय अनेक घरांमध्ये पहाटे एक भजन म्हणूनदेखील या ओळी कानी पडतात; परंतु आता या ओळींचा अर्थ महापालिकेच्या खाजगीकरणामुळे पूर्णत: बदलला आहे. शहरातील कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला फुकटात पाणी मिळणार नाही. ‘अन्नदान व पाण्याचा धर्म करा,’ असे पूर्वजांनी सांगितले होते. मात्र, बदलत्या जगामध्ये पाणी विकण्याची परंपरा मनपाने सुरू केली आहे. समाजसेवा म्हणून मोफत पाणी देण्याची संकल्पनाही बंद झाली असून, आता पैसे द्या आणि पाणी घ्या, असे समीकरण तयार झाले आहे. समांतर जलवाहिनीचे काम खाजगीकरणातून (पीपीपी मॉडेल) सुरू झाले आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे ७९२ कोटी रुपयांच्या त्या योजनेचे काम देण्यात आले आहे. ४०० कोटी रुपये केंद्र व राज्य शासन आणि ४०० कोटी रुपये मनपाचा वाटा या योजनेत आहे. मनपाकडे ४०० कोटी नाहीत. त्यामुळे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज काढून योजनेत गुंतविणार आहे. त्यापोटी पालिका २० वर्षांपर्यंत कंपनीला दरवर्षी ६३ कोटी रुपये देणार आहे.