शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आता फुकटात टँकरचे पाणी बंद

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत.

औरंगाबाद : ‘कभी प्यासे को पानी पिलाया नहींबाद में अमृत पिलाने से क्या फायदा...’ या दोन ओळी अनेकांच्या मोबाईलच्या सिंगटोन, रिंगटोन आहेत. शिवाय अनेक घरांमध्ये पहाटे एक भजन म्हणूनदेखील या ओळी कानी पडतात; परंतु आता या ओळींचा अर्थ महापालिकेच्या खाजगीकरणामुळे पूर्णत: बदलला आहे. शहरातील कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला फुकटात पाणी मिळणार नाही. ‘अन्नदान व पाण्याचा धर्म करा,’ असे पूर्वजांनी सांगितले होते. मात्र, बदलत्या जगामध्ये पाणी विकण्याची परंपरा मनपाने सुरू केली आहे. समाजसेवा म्हणून मोफत पाणी देण्याची संकल्पनाही बंद झाली असून, आता पैसे द्या आणि पाणी घ्या, असे समीकरण तयार झाले आहे. समांतर जलवाहिनीचे काम खाजगीकरणातून (पीपीपी मॉडेल) सुरू झाले आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे ७९२ कोटी रुपयांच्या त्या योजनेचे काम देण्यात आले आहे. ४०० कोटी रुपये केंद्र व राज्य शासन आणि ४०० कोटी रुपये मनपाचा वाटा या योजनेत आहे. मनपाकडे ४०० कोटी नाहीत. त्यामुळे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी मनपाच्या वाट्याची रक्कम कर्ज काढून योजनेत गुंतविणार आहे. त्यापोटी पालिका २० वर्षांपर्यंत कंपनीला दरवर्षी ६३ कोटी रुपये देणार आहे.