शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

आता सोयाबीनचा पीकविमा पेटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:05 IST

शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.आता तुरीच्या समस्येबरोबरच शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही काहीच शेंगा लागलेल्या नसल्याने हत्ता मंडळातील शेतकरी आज सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हा कचेरीवर आले होेते. त्यामुळे उभ्या सोयाबीनसह तुरीच्याही प्रश्नावर चर्चा झाली. हत्ता मंडळात केवळ चारच पाऊस झाले तेही हलक्या स्वरुपाचे. पीक बहरात असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनची फुले गळून गेली. हा बहर गळत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनची खुंटलेली वाढ पुन्हा सुरू झाली. मात्र आता ते नुसतेच वाढत आहे. एकाही झाडाला शेंग लागल्याचे दिसत नाही. हे पीक निव्वळ शेतात गुरे घालण्याच्या लायकीचे बनले आहे. मात्र अस्मानी संकटाचा एवढा मोठा फटका बसलेला असतानाही त्यांचे पीक चांगले असल्याचा समज करून प्रशासनाने त्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. शेतकºयांनी बोंब केल्यानंतर कृषि विभागाचे पाचपट्टे व सोळंके यांनी पाहणी केली.शेतकºयांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. मात्र त्यांचे पंचनामे करणे किंवा इतर बाबी आमच्या हाती काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकºयांनी आ.रामराव वडकुते, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या कानावर जि.प.त जाऊन ही बाब घातल्यानंतर सर्व शेतकरी सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.