शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

आता सोयाबीनचा पीकविमा पेटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:05 IST

शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी हा शासनाच्या धोरणात भरडत चालला असून, त्याच्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. त्यामुळे घरात पडलेल्या तुरी विकण्याचा प्रश्न असतानाच सध्या शेतात उभे असलेले सोयाबीनही १०० टक्के हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी हत्ता मंडळातील शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले होते.आता तुरीच्या समस्येबरोबरच शेतात उभे असलेल्या सोयाबीनलाही काहीच शेंगा लागलेल्या नसल्याने हत्ता मंडळातील शेतकरी आज सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हा कचेरीवर आले होेते. त्यामुळे उभ्या सोयाबीनसह तुरीच्याही प्रश्नावर चर्चा झाली. हत्ता मंडळात केवळ चारच पाऊस झाले तेही हलक्या स्वरुपाचे. पीक बहरात असताना पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनची फुले गळून गेली. हा बहर गळत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीनची खुंटलेली वाढ पुन्हा सुरू झाली. मात्र आता ते नुसतेच वाढत आहे. एकाही झाडाला शेंग लागल्याचे दिसत नाही. हे पीक निव्वळ शेतात गुरे घालण्याच्या लायकीचे बनले आहे. मात्र अस्मानी संकटाचा एवढा मोठा फटका बसलेला असतानाही त्यांचे पीक चांगले असल्याचा समज करून प्रशासनाने त्याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत. शेतकºयांनी बोंब केल्यानंतर कृषि विभागाचे पाचपट्टे व सोळंके यांनी पाहणी केली.शेतकºयांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले. मात्र त्यांचे पंचनामे करणे किंवा इतर बाबी आमच्या हाती काहीच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकºयांनी आ.रामराव वडकुते, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या कानावर जि.प.त जाऊन ही बाब घातल्यानंतर सर्व शेतकरी सोयाबीनचे डहाळे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.