औरंगाबाद : देशभरातील विमानतळांसह चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच कस्टमर सॅटीसफॅक्शनविषयी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रवाशांनी प्राधान्याने वायफाय आणि रेस्टॉरंटची सुविधा नसल्याचे नमूद केल्याने देशभरातील टॉप एअरपोर्टच्या स्पर्धेत चिकलठाणा विमानतळ मागे पडले; परंतु या सर्वेक्षणानंतर प्राधिकरणाने तात्काळ या सुविधांसाठी पुढाकार घेतला असून ‘टॉप एअरपोर्ट’च्या स्पर्धेसाठी विमानतळ सज्ज झाले आहे.विमानतळावरील पार्किंग सुविधा, फ्लाईट इन्फॉर्मेशन स्क्रीन, रेस्टॉरंट, एटीएम, वायफाय, स्वच्छता, कर्मचाऱ्यांकडून मिळणारे सहकार्य, अशा विविध बाबींविषयी प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये प्रवाशांनी वायफाय आणि रेस्टॉरंट या सुविधा नसल्याबाबत प्राधान्याने नमूद केले. त्यामुळे या सुविधांसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये प्रारंभी वायफाय सुविधा सुरू करण्यावर भर दिला; परंतु यामध्ये काही अडचणी आल्याने ही सुविधा अधिक कार्यक्षमपणे (पान २ वर)
आता ‘टॉप एअरपोर्ट’च्या स्पर्धेत उतरण्यासाठी सज्ज
By admin | Updated: May 5, 2016 01:29 IST