शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
3
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
4
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
5
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
6
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
7
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
8
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
9
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
10
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
11
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
12
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
13
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
14
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
15
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
16
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
17
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
18
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
19
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
20
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
Daily Top 2Weekly Top 5

आता पुरुषोत्तम भापकर फोडणार नारेगावची कचराकोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:30 IST

महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून धुरा : सरकारचा महापालिकेवर भरवसा नाही; कच-यात शहराची होळी आणि धुळवड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे. आयुक्तांनी गुरुवारी दुपारी नारेगाव येथील १३ सदस्यीय शिष्टमंडळाशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काहीही साध्य न झाल्यामुळे २ मार्च रोजी दुपारी २.३० वा. पुन्हा बैठक होणार आहे.शहरातील होळी आणि धुळवड दुर्गंधीयुक्त कचºयाच्या ढिगाºयाच्या साक्षीने होणार आहे. दरम्यान, मिटमिटा येथील नागरिकांना आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी ४ वा. चर्चेसाठी बोलावले होते; परंतु तेथील नागरिकांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला. आज झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी एन.के. राम, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची उपस्थिती होती. डॉ. भापकर यांनी सांगितले की, आज दिवसभर नारेगाव, एनजीओ, मिटमिटा येथील नागरिकांना चर्चेसाठी बोलाविले होते. शुक्रवारी दुपारी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. कोर्टाने सर्व स्तरांवर नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी ३ ते ४ पर्याय समोर आले आहेत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नागरिक बैठकीला होते. नागरिकांशी चर्चा करून कचरा विल्हेवाट कुठे करायची याचा निर्णय होणार आहे. कोर्टानेदेखील विभागीय प्रशासनाला यामध्ये पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन अनुषंगाने कचरा डेपो प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे शासनाने अध्यादेश काढून सूचित केले आहे.आता तरी मनपाने धडा घ्यावाआयुक्त डॉ. भापकर म्हणाले की, पालिकेने आता तरी धडा घेतला पाहिजे. कचºयाचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. ओला, सुका कचरा वेगळा करण्याची सवय नागरिकांना लागली पाहिजे. नागरिकांना डस्टबिन मिळाल्या पाहिजेत. तसेच ओला व सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था मनपाकडे असली पाहिजे. संमिश्र कचरा उचलून नेऊन टाकल्यास त्याची दुर्गंधी निर्माण होणे साहजिक आहे.