शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आता पुरुषोत्तम भापकर फोडणार नारेगावची कचराकोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:30 IST

महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून धुरा : सरकारचा महापालिकेवर भरवसा नाही; कच-यात शहराची होळी आणि धुळवड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेवर हायकोर्टानंतर शासनाचादेखील भरोसा राहिलेला नाही. १४ दिवसांपासून शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात मनपाला काहीही करता आले नाही. त्यामुळे शासनाने आता तोडगा काढण्याची धुरा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सोपविली आहे. आयुक्तांनी गुरुवारी दुपारी नारेगाव येथील १३ सदस्यीय शिष्टमंडळाशी तब्बल दोन तास चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काहीही साध्य न झाल्यामुळे २ मार्च रोजी दुपारी २.३० वा. पुन्हा बैठक होणार आहे.शहरातील होळी आणि धुळवड दुर्गंधीयुक्त कचºयाच्या ढिगाºयाच्या साक्षीने होणार आहे. दरम्यान, मिटमिटा येथील नागरिकांना आयुक्तांनी गुरुवारी सायंकाळी ४ वा. चर्चेसाठी बोलावले होते; परंतु तेथील नागरिकांनी प्रशासनाला ठेंगा दाखविला. आज झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी एन.के. राम, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची उपस्थिती होती. डॉ. भापकर यांनी सांगितले की, आज दिवसभर नारेगाव, एनजीओ, मिटमिटा येथील नागरिकांना चर्चेसाठी बोलाविले होते. शुक्रवारी दुपारी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. कोर्टाने सर्व स्तरांवर नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तरी ३ ते ४ पर्याय समोर आले आहेत. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व नागरिक बैठकीला होते. नागरिकांशी चर्चा करून कचरा विल्हेवाट कुठे करायची याचा निर्णय होणार आहे. कोर्टानेदेखील विभागीय प्रशासनाला यामध्ये पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन अनुषंगाने कचरा डेपो प्रकरण प्राधान्याने हाती घेण्याचे शासनाने अध्यादेश काढून सूचित केले आहे.आता तरी मनपाने धडा घ्यावाआयुक्त डॉ. भापकर म्हणाले की, पालिकेने आता तरी धडा घेतला पाहिजे. कचºयाचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. ओला, सुका कचरा वेगळा करण्याची सवय नागरिकांना लागली पाहिजे. नागरिकांना डस्टबिन मिळाल्या पाहिजेत. तसेच ओला व सुका कचरा वाहून नेण्याची व्यवस्था मनपाकडे असली पाहिजे. संमिश्र कचरा उचलून नेऊन टाकल्यास त्याची दुर्गंधी निर्माण होणे साहजिक आहे.