शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आता आंध्रात पाटोदा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:52 IST

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली.

वाळूज महानगर : आंध्र प्रदेश विधानसभेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. या गावाने राबविलेले विविध उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्याचा निर्धार या मंडळाने व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे रोल मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटोदा गावाला आंध्र प्रदेश शिष्टमंडळाने विविध विकासकामांची पाहणी केली. पाटोदा गावात लोकसहभागातून विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. गावातील ग्रामपंचायतीचा संगणकीकृत कारभार, वीज बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी घरासमोर एक झाड, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कॅरिबॅग वापरावर बंदी, गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व व्यसनापासून ग्रामस्थांनी दूर राहावे, यासाठी गुटखा व दारूविक्रीवर बंदी, संपूर्ण ड्रेनेजलाईन व गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, आगाऊ कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत संसारोपयोगी साहित्याची भेट, संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, गावात सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे रस्ते, महिला, पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, कचरा साठवण्यासाठी डस्टबिन, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, शालेय विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार, घराच्या मालकी हक्कात पती-पत्नीची नावे, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या, एटीएम कार्डद्वारे नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा तसेच ग्रामपंचायतीद्वारे गावातील सर्व कुटुंबियांना २० लिटर शुद्ध पाणी आदी सुविधा पुरविण्यात येत आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर, नागरिकांना संगणकीकृत प्रमाणपत्राचे वाटप, मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत, जातीय सलोखा, धार्मिक, सामाजिक उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग, गावाच्या विकासासाठी एकजूट दाखविणारे नागरिक आदींमुळे पथकातील सदस्यही अचंबित झाले होते.पाटोदाने राबविलेले विविध कल्याणकारी उपक्रम आंध्र प्रदेशात राबविण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष डॉ. कोडेलासिवा प्रसादराव व आमदारांनी व्यक्त केले. पादोटा गावचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे पथकातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या पथकात महिला व बालकल्याणमंत्री किमिडी मृणालिनी, आ. कगिंथा व्यंकटराव, आ.येलुरी संबा सिवाराव, आ. जयनागेश्वर रेड्डी, डी.ए.सत्यप्रभा, गता मसला, अन्नाम सतीश प्रभाकर, गी श्रीनिवासुलू, डॉ. एम.गेयानंर, पमेंटसा विष्णुकुमार, मथुमुला रेड्डी, विधानसभा सचिव के.गुरुमूर्ती, जनसंपर्क अधिकारी बोपन्ना रविकुमार आदींचा समावेश होता. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कदम, शिक्षणाधिकारी छायादेवी कवडदेव, विस्तार अधिकारी एस.डी.साळुंके, स्वच्छ भारत अभियानचे राज्य समन्यवक तथा माजी सरपंच भास्करराव पा.पेरे, सरपंच कल्याण पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी आर.डी.चौधरी, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा कदम आदींनी गावात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती पथकातील सदस्यांना दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंदनसिंग मेहर, किशोर पेरे, जनार्दन भाग्यवंत, लहू मुचक, अण्णासाहेब पेरे, जगन्नाथ पेरे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.