शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आता जठरापासून होते तयार नवी अन्ननलिका

By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST

औरंगाबाद : जेवताना घास गिळण्यास त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेतील त्रासाची अनेक कारणे असतात. त्यातीलच एक कारण म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर होय.

औरंगाबाद : जेवताना घास गिळण्यास त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेतील त्रासाची अनेक कारणे असतात. त्यातीलच एक कारण म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर होय. परंतु हा कॅन्सर झाला म्हणजे घाबरण्याचे काही कारण नाही. वेळीच उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते. उपचारासाठी बऱ्याचदा अन्ननलिका काढावी लागते. अशा परिस्थितीमुळे आता जठरापासून नवीन अन्ननलिका तयार शक्य झाले आहे. औरंगाबादेतील विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षाकाठी अशा २० शस्त्रक्रिया करून रुग्णाला नवे आयुष्य दिले जात आहे.शहरातील विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. तेव्हापासून कॅन्सरने ग्रस्त हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळत आहे. कॅन्सर रुग्णांसाठी पूर्वी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. परंतु औरंगाबादेत कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाले आणि रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. विविध कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण कॅन्सर हॉस्पिटलला प्राधान्य देत आहेत. इतर राज्यांतील आणि विदेशी रुग्णही या हॉस्पिटलमध्ये येतात. अनेक कॅन्सरप्रमाणे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे रुग्णही या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. प्रत्येक वेळी घास गिळायला त्रास होणे म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर असू शकत नाही. त्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामुळे अन्न गिळताना त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. वेळीच उपचार घेतल्यास शस्त्रक्रिया करून कॅन्सरची गाठ काढून टाकली जाते. परंतु अनेकदा अन्ननलिकाच काढून टाकावी लागते. अशा वेळी जठरापासून अन्ननलिका तयार के ली जाते. ही नवीन अन्ननलिका मूळ अन्ननलिकेच्या जागी बसवून अन्न जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाते. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वर्षभरात अशा जवळपास २० शस्त्रक्रिया होतात. अशा शस्त्रक्रियांसाठी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व डॉक्टर परिश्रम घेतात.