शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

आता जनता भाजपाला करणार बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:40 IST

विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़प्रभाग ५ व १९ मधील काँगे्रस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर आ.डी.पी.सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, नरेंद्र चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, सभापती माधवराव मिसाळे, सुखदेव जाधव, अ‍ॅड.निलेश पावडे, जयश्री पावडे, महेंद्र पिंपळे, अपर्णा नेरलकर, फारूक अली खान, राजू काळे, चित्रा गायकवाड, दीपाली मोरे, अंबिका काकडे यांची उपस्थिती होती.खा.चव्हाण म्हणाले, देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. आधी मनपावर व त्यानंतर देश आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. या सरकारने महागाई वाढविली. सामान्यांचे जगणे अवघड केले.पेट्रोलचे भाव वाढविले, रेशन दुकानावरील साखर बंद केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलण्याचे काम हे सरकार करीत आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचे पातक मोदी व फडणवीस करीत आहेत.देशामध्ये मनूवाद आणण्याचा आरएसएसने कट रचला आहे. दलित वस्ती विकासासाठी आलेला ३० कोटी रुपयांचा निधी या शासनाने महापालिकेला दिला नाही. मागील तीन वर्षांपासून महापालिकेला दोन्ही शासनाकडून एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मत मागण्याचा भाजपाला अधिकार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी आ. डी. पी. सावंत म्हणाले, जेएनएनयुआरएम व गुरु - त्ता- गद्दीच्या माध्यमातून शहराचा मोठा विकास झाला. नांदेडकरांसाठी विकास लांब नाही. कारण त्यांच्या जवळ खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व आहे.काँग्रेस पक्ष सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पुढाकार घेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारसरणीला मानणारा हा पक्ष आहे. खा.अशोकराव चव्हाण हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. अशोकरावांनी बावरीनगरचा विकास करण्यासाठी मोठा निधी दिला. या भागाचा संपूर्ण विकास होण्यासाठी पुन्हा एकदा खा.अशोकराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.