शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आता जनता भाजपाला करणार बाय-बाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:40 IST

विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विकासाच्या नावाने राज्य आणि केंद्रात बोंबाबोंब चालू आहे. लोकांना या सरकारने वाºयावर सोडले आहे. मूळ प्रश्नांना बगल देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चायवर बोलतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी गायीवर बोलतात; पण जनता यांना कंटाळली असल्यामुळे भाजपाला बाय- बाय करीत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले़प्रभाग ५ व १९ मधील काँगे्रस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर आ.डी.पी.सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, नरेंद्र चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रभारी डॉ. श्याम पाटील तेलंग, सभापती माधवराव मिसाळे, सुखदेव जाधव, अ‍ॅड.निलेश पावडे, जयश्री पावडे, महेंद्र पिंपळे, अपर्णा नेरलकर, फारूक अली खान, राजू काळे, चित्रा गायकवाड, दीपाली मोरे, अंबिका काकडे यांची उपस्थिती होती.खा.चव्हाण म्हणाले, देशातून भाजपाला हद्दपार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. आधी मनपावर व त्यानंतर देश आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे. या सरकारने महागाई वाढविली. सामान्यांचे जगणे अवघड केले.पेट्रोलचे भाव वाढविले, रेशन दुकानावरील साखर बंद केली, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलण्याचे काम हे सरकार करीत आहेत. मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचे पातक मोदी व फडणवीस करीत आहेत.देशामध्ये मनूवाद आणण्याचा आरएसएसने कट रचला आहे. दलित वस्ती विकासासाठी आलेला ३० कोटी रुपयांचा निधी या शासनाने महापालिकेला दिला नाही. मागील तीन वर्षांपासून महापालिकेला दोन्ही शासनाकडून एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मत मागण्याचा भाजपाला अधिकार नाही, असेही ते म्हणाले.यावेळी आ. डी. पी. सावंत म्हणाले, जेएनएनयुआरएम व गुरु - त्ता- गद्दीच्या माध्यमातून शहराचा मोठा विकास झाला. नांदेडकरांसाठी विकास लांब नाही. कारण त्यांच्या जवळ खा. अशोकराव चव्हाण यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व आहे.काँग्रेस पक्ष सामाजिक सलोखा राखण्यामध्ये पुढाकार घेतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारसरणीला मानणारा हा पक्ष आहे. खा.अशोकराव चव्हाण हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. अशोकरावांनी बावरीनगरचा विकास करण्यासाठी मोठा निधी दिला. या भागाचा संपूर्ण विकास होण्यासाठी पुन्हा एकदा खा.अशोकराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.