शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आता फेरफार होणार आॅनलाईन...!

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आता तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही.

औरंगाबाद : जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आता तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यात लवकरच ई-फेरफार प्रक्रिया लागू होणार आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफारला सुरुवात होत असून, त्यानंतर उर्वरित तालुक्यांमध्येही त्याची अंमलबजावणी होणार आहे.जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपासून सातबारा अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. खुलताबाद तालुक्यातील सर्व सातबारा अपडेट झाले असून, त्याचे संगणकीकरणही पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील कामही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जिल्ह्यात ई- फेरफार (आॅनलाईन म्युटेशन) प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम खुलताबाद तालुक्यात येत्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयाने ई-फेरफार ही आज्ञावली विकसित केली आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी, हवेली आणि पुणे शहर तालुक्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ई- फेरफार आज्ञावलीद्वारे तालुकास्तरावरील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे डेटा सेंटरद्वारे एकमेकांशी आॅनलाईन जोडले जाणार आहेत. तसेच गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयालाही या आज्ञावलीद्वारे जोडले जात आहे. त्यामुळे रजिस्ट्री कार्यालयात खरेदी-विक्रीचा व्यवहार होताच फेरफारची कार्यवाही आॅनलाईन सुरू होईल. सध्या नागरिकांना खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर मिळकतीला आपले नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागते. परंतु बऱ्याच वेळा तलाठी भेटत नाही किंवा भेटला तरी सातबारावर फेर घेण्यास टाळाटाळ होते. ई-फेरफारमुळे आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच भासणार नाही.कार्यवाही सुरू ई- फेरफारसाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. सर्व संबंधित कार्यालये सर्व्हरशी जोडण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफार प्रक्रिया सुरू होईल. उर्वरित तालुक्यांतही लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.- विक्रमकुमार,जिल्हाधिकारी, औरंगाबाद