शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आता फेरफार होणार आॅनलाईन...!

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आता तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही.

औरंगाबाद : जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी आता तलाठ्याकडे चकरा मारण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यात लवकरच ई-फेरफार प्रक्रिया लागू होणार आहे. येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफारला सुरुवात होत असून, त्यानंतर उर्वरित तालुक्यांमध्येही त्याची अंमलबजावणी होणार आहे.जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपासून सातबारा अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. खुलताबाद तालुक्यातील सर्व सातबारा अपडेट झाले असून, त्याचे संगणकीकरणही पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ तालुक्यांतील कामही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जिल्ह्यात ई- फेरफार (आॅनलाईन म्युटेशन) प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम खुलताबाद तालुक्यात येत्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख कार्यालयाने ई-फेरफार ही आज्ञावली विकसित केली आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी, हवेली आणि पुणे शहर तालुक्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ई- फेरफार आज्ञावलीद्वारे तालुकास्तरावरील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय हे डेटा सेंटरद्वारे एकमेकांशी आॅनलाईन जोडले जाणार आहेत. तसेच गावपातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयालाही या आज्ञावलीद्वारे जोडले जात आहे. त्यामुळे रजिस्ट्री कार्यालयात खरेदी-विक्रीचा व्यवहार होताच फेरफारची कार्यवाही आॅनलाईन सुरू होईल. सध्या नागरिकांना खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर मिळकतीला आपले नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागते. परंतु बऱ्याच वेळा तलाठी भेटत नाही किंवा भेटला तरी सातबारावर फेर घेण्यास टाळाटाळ होते. ई-फेरफारमुळे आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच भासणार नाही.कार्यवाही सुरू ई- फेरफारसाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. सर्व संबंधित कार्यालये सर्व्हरशी जोडण्यात येत आहेत. येत्या आठवड्यात खुलताबाद तालुक्यात ई- फेरफार प्रक्रिया सुरू होईल. उर्वरित तालुक्यांतही लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल.- विक्रमकुमार,जिल्हाधिकारी, औरंगाबाद