शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता आशा वर्कर करणार समुपदेशन

By admin | Updated: December 16, 2015 23:14 IST

इलियास शेख, कळमनुरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली

इलियास शेख, कळमनुरी प्रेरणा प्रकल्प शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली. सततची नापिकी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखाव्यात याबाबत तालुक्यातील १९५ आशा वर्करला तालुकास्तरावर २८ व ३० नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक आशा वर्कर त्यांच्या गावातील शेतकऱ्यांचा सर्वे करत आहेत. प्रत्येक आशा वर्करला सर्वेसाठी २५० घरे दिली आहेत. शेतकरी कोणत्या कारणाने आत्महत्या करीत आहे, त्याची कारणे शोधणार आहेत. त्यात नापिकी, व्यसन, गंभीर आजार, मुला-मुलींचे लग्न आदी कारणे राहणार आहेत. शेतकऱ्यांना नैराश्य कशामुळे आले, याची कारणे आशा वर्कर शोधून काढणार आहेत. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन, गंभीर कारण असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे समुपदेशनासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. सौम्य नैराश्य असेल तर आशा वर्करच समुपदेशन करणार आहेत. मध्यम नैराश्य असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र तीव्र नैराश्य असेल तर जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठविल्या जाणार आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन करायचे असेल तर टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करुन दिला आहे. तेथून थेट मानसोपचार तज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जाणार आहे.